Skip to main content
कोळविहिरे चौकातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे अपघातांचा धोका; पुलाखालील वाहनांवरही कारवाईची मागणी सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरीतील कोळविहिरे चौक परिसरात रस्त्याच्या कडेला तसेच पुलाखाली चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.चौक परिसरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला किंवा पुलाखाली वाहने उभी राहिल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढू शकतो, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.मागील शुक्रवारी याच परिसरात झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर कोळविहिरे चौकातील वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.रस्त्यावर किंवा पुलाखाली वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांची संबंधित वाहतूक पोलिसांनी पाहणी करून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, तसेच परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment