पुरंदर तालुक्यातील गराडे येथील ढोणे वस्ती परिसरातील गोठ्यातून 9 गाई व 9 महशी एकूण 18 जनावरे चोरी प्रकरणी सासवड पोलिसांची मोठी अशी कारवाई आरोपी अटके मध्ये 29.10 लाखाचा मुद्देमाल जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील गराडे येथील ढोणे वस्ती येथील 9 गाई 9 म्हशी एकूण 18 चोरी प्रकरणाचा सासवड पोलिसांनी अवघ्या काही दिवसा मध्ये छडा लावून एका आरोपीला अटक केली असून, चोरीस गेलेली सर्व 18 जनावरे आणि चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण 29 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात संतोष बापूसो कटके राहणार भिवरी तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस ठाणे मध्ये फिर्याद दाखल केली होती. 13 जुलै च्या रात्री ते 14 जुलै च्या पहाटे दरम्यान गराडे येथील ढोणे वस्तीतील त्यांच्या गोट्यामधून 9 गाई 9 म्हशी असा एकूण 17 लाख 90 हजार रुपये किमतीची 18 जनावरे आज्ञात चोरट्याने चोरून नेली होती, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 329/ 2026 भारतीय आणि संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष असे पथक तयार केले होते, घटनास्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटीचे परीक्षण आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा मागॅ काढण्यात आला जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सात लाख 70 हजार रुपये किमतीच्या मुर्रा जातीच्या सात म्हशी प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये, अंदाजे दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या जाफराबादी जातीच्या दोन म्हशी प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये, अंदाजे सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या एक ए एफ जातीच्या नऊ गाई प्रत्येकी 80 हजार रुपये अंदाजे, बारा लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा 1492 टेम्पो जुवा की आ एकूण 29 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सीसीटीव्ही मध्ये दोन आयशर टेम्पो मधून जनावरे नेताना आरोपी दिसून आले, त्यापैकी एका टेम्पोच्या पुढील कारचे छत्रपती शिवाजी महाराजांचा रेडियम फोटो असल्याचा महत्त्वाचा धागा पोलिसांना मिळाला होता, गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी मोजे गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथील गोठ्यावर छापा टाकला, तेथे फिर्यादीच्या मालकीच्या आठ म्हशी आढळून आल्यात ,याच ठिकाणी फिर्यादीच्या गोठ्यामध्ये काम करणारा महादेव यादव मूळ राहणार बिहार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ,त्याने दोन साथीदारांच्या मदतीने जनावरे चोरल्याची कबुली दिली, त्यानंतर न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडीमध्ये आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, उर्वरित जनावरे फडतरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील एका गोट्यात लपून ठेवल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन पाहणी केली असता, उर्वरित नऊ गाई व दोन म्हशी जप्त करण्यात आल्या, त्या कारवाईमध्ये पोलिसांनी सात मुरारा जातीच्या म्हशी, दोन जाफराबादी म्हशी, नऊ एक्स गाई आणि चोरीसाठी वापरलेला टाटा 1492 टेम्पो असा एकूण 29 लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग आहे का ? तसेच आरोपींना यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का ? याचा तपास सुरू आहे, ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारीच राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे, पोलीस हवालदार विशाल जाधव, पोलीस नाईक गोकुळ हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण शेंडे, तुषार लोंढे आणि सचिन किवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.