Skip to main content
पुरंदर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 5.09 कोटी पिक विमा मंजूर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यात खरीप 2025 मध्ये कांदा पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते ,प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सदर नुकसान झालेल्या पुरंदर तालुक्यातील एकूण 2066 शेतकऱ्यांना एकूण रुपये 50956064 (5 कोटी 9 लाख) इतकी विमा भरपाई रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, खरीप 2025 या हंगामामध्ये कांदा पिकाचा विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 53,000 रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली असून, तालुक्यातील एकुण 80 गावातील शेतकऱ्यांचे ही नुकसान भरपाई मिळणार आहे. यात प्रामुख्याने पुढील गावाचा समावेश आहे.(गाव व शेतकरी संख्या)1) नायगाव-155 2)पिपरी-150 3)माळशिरस- 138 4) राख -121 5) राजुरी -116 6) रिसे- 85 7) नाझरे सुपे- 83 8) टेकवडी- 82 9) शिवरी- 72 इत्यादी , थोडक्यात माहिती1) योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना 2)पिक- कांदा 3) हंगाम खरीप -2025 4) एकूण मजूर रक्कम -509560 64 (5 कोटी 9 लाख) रुपये 5) शेतकरी संख्या- 2066 6) गावे संख्या -80 7) कांदा पिक विमा मंजूर झालेली एकूण क्षेत्र- 961 हेक्टर 8) हेक्टरी नुकसान भरपाई 53,000 रुपये अशी माहिती पुरंदर तालुक्याचे कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी प्रतिनिधीशी बोलताना ही सर्व माहिती सविस्तर दिली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment