Skip to main content
आषाढी पालखी सोहळा 2026' भक्ती विठ्ठलाची सेवा' ही आरोग्याची उपक्रम यशस्वी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आषाढी पालखी सोहळा 2026 च्या दरम्यान लाखो वारकरी बांधवांची वारी सुरक्षित निरोगी आणि सुखकर व्हावी या उद्देशामुळे पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राबविलेला' भक्ती विठ्ठलाची सेवा' आरोग्याची उपक्रम यशस्वी ठरला असून,4 ते 12 जुलै या कालावधीमध्ये एकूण 52,429 वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ देण्यात आला या कालावधीत 52 हजार 429 वारकऱ्यांची बाह्य रुग्ण, ओपीडी तपासणी करण्यात आली. त्यापैकी 793 रुग्णावर अंतर रुग्ण आयपीडी उपचार करण्यात आले, तर 137 रुग्णांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयांमध्ये रेफर करण्यात आले, आरोग्य विभागाच्या अहवालानुसार तापाचे 6,739 सर्दी व अंगदुखीचे 3,374 उच्च रक्तदाबाचे 1,400 मधुमेहाचे 1,162 किरकोळ अतिसाराचे 4,44 शवानदंशाचे 1,22 तर सपॅदंशाचे 2 रस्ते अपघातातील 6,2 हृदयविकाराचे 8 तसेच इतर विविध आजारांच्या 34 हजार 391 रुग्णावर उपचार करण्यात आले. उपचारा दरम्यान आवश्यक औषधी आपत्कालीन सेवा आणि रेफर सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्या. पालखी मार्गावरील प्रत्येक मुक्काम स्थळी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका, औषध साठा, अपत्यकालीन उपचार साहित्य पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, अन्नसुरक्षा पथके आणि साथीच्या आजारावरील देखरेख व्यवस्था 24 तास कार्यरत ठेवण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज तसेच संत सोपान काका पालखी मार्गावरही आरोग्य सेवा अखंड सुरू ठेवण्यात आली, दिवेघाट परिसरात हृदयविकाराचा झटका आलेल्या 70 वर्षे जेष्ठ नागरिक वारकऱ्याला आरोग्य विभागाच्या प्रशिक्षित वैद्यकीय पथकाने वेळेवर सीपीआर देत जीवदान दिल्याने आरोग्य सेवेची तत्परता आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली. जिल्हा परिषद पुणे चे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी आषाढी वारीही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाचे प्रतीक असल्याचे सांगत लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी लक्षात घेऊन भक्ती विठ्ठलाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून अत्यंत नियोजन बद्ध आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. पालखी मार्गावरील आरोग्य यंत्रणेने वेळेवर उपचार आपत्तीकालीन सेवा आणि आवश्यक रेफरल सुविधा उपलब्ध करून, वारकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचे सांगत दिवे घाट येथे हृदयविकाराचा झटका आलेल्या वारकऱ्याला वेळेवर सीपीआर देऊन जीवदान दिल्याची घटनाही आरोग्य विभागाच्या सज्जतीचे आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे, या सेवा कार्यात योगदान देणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी ,रुग्णवाहिका पथके तसेच संबंधित विभागाचे त्यांनी एक प्रकारे अभिनंदन केले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment