पुरंदर तालुक्यात पालखी सोहळ्यासाठी सासवड नगरी सज्ज असे मत नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड शहरांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 11 जुलै रोजी आगमन होणार असून, 12 जुलै रोजी मुक्काम आणि 13 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे, तसेच श्री संत सोपान काका महाराज व श्री संत चांगावटेश्वर महाराज यांच्या पालख्याही बारा जुलै रोजी सासवड मधून पंढरपूरकरकडे मार्गस्थ होणार आहेत, नगराध्यक्षा नंदी काकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पालखी सोहळ्याच्या स्वागताकरता व वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नगरपरिषद सज्ज आहे अशी माहिती मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी दिली आहे स्वच्छता व आरोग्य व्यवस्था निर्मल वारी अभियानांतर्गत सुमारे 10,800 असणे फायबर शौचालयांची उभारणी विविध ठिकाणी करण्यात आली आहे. पालखीतळ परिसराची संपूर्ण स्वच्छता स्वच्छतागृहाची दुरुस्ती पाणी व व्यवस्था करण्यात आली आहे, शहरातील स्वच्छता फॉगिंग पालखी मार्गावरील स्वच्छता यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जंतुनाशक व तन नाशक साठा उपलब्ध करून फवारणी सुरू आहेत, तात्पुरती स्नानगृही उभारली जाणार असून, दोन ठिकाणी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदी संदर्भात असता पनांना नोटीस देण्यात आले असून,स्टोअरधारकांना कचरा संकलनासाठी पिशव्या व कचरापेटी ठेवण्यात येणार आहेत, पालखी प्रस्तावनानंतर शहरात पुन्हा जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे, शाळा, हॉटेल यांची स्वच्छता व तपासणी करण्यात येत आहे, मच्छी व मटन विक्रेतांना तात्पुरते दुकाने बंद ठेवण्याची निर्देश देण्यात आले आहेत, पाणीपुरवठा व अग्निक क्षमण व्यवस्थापन आणि पुरवठ्यासाठी 12 विहिरीवर टँकर भरण्याची व्यवस्था करण्यासोबतच पाण्याची नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत, ब्लिचिंग पावडर टाकण्याची व्यवस्थापन यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक दक्षता घेतली आहे, अखंड विज पुरवठ्यासाठी महावितरणला पत्रव्यवहार करण्यात आला आहे ,अग्निशमन दलाचे वाहन टँकर व तात्काळ पथक सज्ज ठेवण्यात आले आहे, विद्युत व्यवस्था शहरातील सर्व स्ट्रीट लाईट कार्यरत राहतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे, पालखी मार्ग पालखी तळ व सोपानदेव मंदिर परिसरात विक्री व्यवस्था व दिवे बसवण्यात आले आहेत, जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून, विद्युत तारा व झाडांच्या फांद्यांची छाटणी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येत आहे, बांधकाम व नगर रचना पालखीतळाची सपाटीकरण पाणी साचू नये यासाठी उपाय योजना मुरूम भरणे व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवणे खड्डे बुजवणे व रस्ते वाहतुकीसाठी मध्ये ठेवण्याचे काम सुरू आहे, अनधिकृत होर्डिंग करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे,सीसीटीव्ही व एलईडी व्यवस्था सुरक्षेसाठी पालखीतळ व सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली असून, भाविकांसाठी एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहेत, नियंत्रण कक्षा, दूरध्वनी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, स्वागत निरोप व पूजा व्यवस्था संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत तसेच संत सोपान देव संत चांगावटेश्वर महाराज पालखीचा निरोप कार्यक्रमासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे, पालखीतील पादुकांची महापूजा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे, स्वागत निरोप व पूजा व्यवस्था संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत तसेच संत सोपान देव व संत चांगावटेश्वर महाराज पालखीचा निरोप कार्यक्रम साठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, पालखीतील पादुकांची महापूजा व नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे, शाळा वगैरे कक्षा दिंडी प्रमुखाच्या मागणीनुसार शाळा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, आचार्य यात्रे सांस्कृतिक भवन येथे हिरकणी कक्ष स्थापन करून ,महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, नियंत्रण कक्ष पालखीतळा शेजारी व नगरपालिका कार्यालयासमोर असे दोन नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून ,24 तास कार्यरत राहतील प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध राहणार आहे ,पुरुष व महिला भाविकांसाठी स्वतंत्र रांगा व बॅरिकेटिक व्यवस्था करण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी 185 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, विविध विभागांच्या माध्यमातून व्यापक तयारी करण्यात आली आहे ,दिवे नाका येथे पालखीचे स्वागत तर जेजुरी नाका येथे निरोप देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, भाविकांना सुलभ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरात दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी दिली आहे.

जगताप च

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.