माईंच्या लेकी-जावयांचा सन्मान’ सोहळ्यात उसळला भावनांचा महापूर दिपकदादा यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त ममता सिंधुताई सपकाळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी उभारलेल्या विशाल कुटुंबातील मायेचा, संस्कारांचा आणि नात्यांच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “अधिक मासाचे वाण - माईंच्या लेकजावयांचा सन्मान” या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात भावनांचा अक्षरशा: महापूर उसळला.यावेळी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ, कीर्ती, ज्योती, मंजुषा आणि गौरी यांनी अतिशय भावनाविवश होत आपल्या भावना व्यक्त केल्या. “माईंचे पहिले मानसपुत्र दीपकदादा गायकवाड हेच आमच्या सर्व लेकींसाठी खरे माहेर आहेत. दादा आजही कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारीने भूमिका पार पाडत आहेत. ते आम्हाला कधीच विसरत नाहीत, याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या लेकरांना त्यांच्या रूपाने प्रेमळ, कर्तृत्ववान आणि निरागस मनाचा मामा लाभला आहे. प्रत्येकाची मनापासून काळजी घेणारा असा भाऊ आजच्या युगात दुर्मिळ आहे,” असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, तर भव्य मंडपातील अनेकांचे डोळेही पाणावले.पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी १९९२ साली स्थापन केलेल्या ममता बाल सदन संस्थेत आजपर्यंत तब्बल २२० मुलींची थाटामाटात लग्ने लावून दिली आहेत. या सर्व लेकी आज आपल्या संसारात सुखाने नांदत असून माईंच्या कुटुंबात आज २२० लेक-जावयांचा मोठा परिवार निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेनुसार तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. याच परंपरेचे जतन करत माईंच्या संस्थेने “अधिक मासाचे वाण – माईंच्या लेकजावयांचा सन्मान” हा उपक्रम राबविला. या सोहळ्यासाठी लेकी व त्यांच्या जावयांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जावयांना नवीन पोशाख, तर लेकींना साडी-चोळी, जोडवे (बिचवे), तामणदीप, निरंजन, ३३ अनारसे आणि तुळशीचे रोप अशा पारंपरिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ज्या प्रेमाने आणि आदराने प्रत्येक वडील अधिक मासात आपल्या लेकीला घरी बोलावून तिचा सन्मान करतात, त्याच संस्कृतीचे पालन करत ‘बापमाणूस’ म्हणून दीपकदादा गायकवाड यांनी माईंची परंपरा जिवंत ठेवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता बाल सदन (बालगृह)चे अध्यक्ष दीपक गायकवाड होते. यावेळी सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ, लामा फेरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र शुक्ला, शर्मिष्ठा जाधव, अनुश्री रिसवाडकर, शास्वती रिसवाडकर, बजरंग वाघ, चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. संजय रावळ, डॉ. दिलीप वाघोलीकर, डॉ. वांढेकर, डॉ. शेट्टी, अनिकेत खरे, पूजा खरे आणि शीतल सिनगारे, विनय सपकाळ, मनीष बोपटे, देविदास अरबट,पत्रकार बापू मुळीक सासवडच्या नगराध्यक्षा आनंदी (काकी )जगताप,राजवर्धिनी जगताप, जिल्हा परिषद सदस्य अजय इगले,न्यायालयाचे संजय खामकर, प्रविण जगताप पंचायत समिती पुरंदर उपसभापती आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. माईंच्या विचारांची, संस्कारांची आणि ममतेची परंपरा आजही तितक्याच ताकदीने पुढे चालत असल्याचे हे भावस्पर्शी चित्र पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन भारावून गेले.चौकट कृतज्ञता आणि अश्रूंच्या साक्षीने भारावला परिसर...* काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक घट्ट असतात. काही घरे विटा-मातीची नसतात, ती मायेने उभी राहतात. आणि काही माहेरं आई गेल्यानंतरही संपत नाहीत. ती एखाद्या माणसाच्या रूपाने कायम जिवंत राहतात. ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे आज असेच एक भावविश्व उभे राहिले आणि संपूर्ण परिसर मायेच्या, कृतज्ञतेच्या आणि अश्रूंच्या साक्षीने भारावून गेला. माईंच्या जाण्यानंतरही त्यांचे कुटुंब विखुरले नाही; उलट मायेच्या धाग्यांनी आणखी घट्ट विणले गेले आहे. आणि त्या धाग्यांना जपणारे नाव म्हणजे दिपकदादा असे भाव, यावेळी उमटल्याचे दिसून आले. चौकट अनेक लोकप्रतिनिधींनी दिल्या भेटी... अधिक मास सोहळ्यात रश्मी कोलते, हरिभाऊ लोळे, शशिकला विजय कोलते, जितेंद्र कांबळे, पांडुरंग भोसले, उद्योजक अजित गोळे, यांच्यासह जिल्हयातील अनेक लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट देऊन लोकजावयांना आशीर्वाद दिले. एवढंच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. ठाणे येथील ८० वर्षीय रंजना गायकवाड यांनी सुद्धा सोहळ्यात उपस्थित राहून आशीर्वाद दिले.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.