आषाढी वारी साठी नियोजन विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडून पालखी महामार्गाची थेट अशी पहाणी सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुविधा आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पुणे जिल्ह्यातील आळंदी, देहू, हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे आणि निरा येथील पालखी मार्गाची पाहणी करून, त्यांनी व्यवस्थेचा सविस्तर असा आढावा घेतला, सासवड येथील पालखीतळाची पाहणी करून त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा वेळेत पूर्ण करण्याची निर्देश दिले आहेत .पुणे जिल्ह्यातील पाहणी दौरा आटोपून विभागीय आयुक्त पुढील आढाव्यासाठी सातारा आणि सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाल्या आहेत, प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्ट वरती सासवडमध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती विभागीय आयुक्तांनी सासवड येथील पालखीतळाला भेट देऊन, तेथील तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी गजानन पाटील, उपायुक्त तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत आणि पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर, सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप तसेच महावितरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि अन्य शासकीय यंत्रणेचे अधिकारी आधी उपस्थित होते. वीज पाणी आणि रस्ते व्यवस्थेवर विशेष असा भर द्यावा सासवड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर जगताप ,गटनेते अजित जगताप यांनी विभागीय आयुक्तांचे स्वागत करून नगरसेवक राजन भैया जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, अस्मिता उमेश जगताप, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे आणि अजय कैलास इंगळे या स्थानिक नेत्यांनी वारी दरम्यान उद्भवणाऱ्या स्थानिक समस्या विषयी प्रशासनाचे लक्ष वेधले, सासवड पालखीतळाची पाहणी करताना आयुक्तांची चंदन टेकडी ते पालखी तळापर्यंत पुरेशी व सुरक्षित प्रकाश योजना उभारण्याच्या सूचना सासवड नगर परिषदेला देण्यात आलेल्या आहेत, महावितरण ला विद्युत सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, विद्युत अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यास सुद्धा सांगितलेले आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण फुरसुंगी ते दिवे घाट रस्त्याची प्रलंबित काम युद्ध पातळी पूर्ण करण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत ,दिवेघाट परिसरातील खोदकामामुळे पावसाळ्यात दगड किंवा माती रस्त्यावर येऊन वारकऱ्यांच्या सुरक्षेतेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक बारीक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, पालखीतळ आणि विसावा स्थळावर पाणी साचणाऱ्या भागांमध्ये मुरूम टाकून आवश्यक अशा दुरुस्ती करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत ,वारकऱ्यासाठी पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांची तयारी पालखी मुक्काम वीसावा असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी अतिरिक्त राखीव पंप उपलब्ध ठेवणे टँकर संख्या वाढवणे आणि पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवणे यावर आयुक्तांनी भर दिलेला आहे. मार्गावरील आवश्यक ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत, उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही परिस्थितीचा विचार करून बोरावके मळा खळद आणि शिवरी येथे आरोग्य मदत केंद्र उभारण्याबरोबरच पुरेशी वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्याची निर्देश देण्यात आलेली आहेत, झेंडेवाडी ते वाल्हे पर्यंत पाहणी आयुक्तांनी झेंडेवाडी विसावा तळापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली त्यानंतर सासवड जेजुरी आणि वाल्हे येथील पालखी मुक्काम तळाची तसेच बोरावके मळा ,यमाई शिवरी ,साकुर्डे दौंडज शिव आणि पिंपरी खुर्द येथील विसावा तळाची प्रत्यक्ष पाहणी करून सुविधा आणि तयारीचा आढावा घेतला.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.