Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणची वारंवार वीज खंडित झाल्यामुळे सासवडमधील सामान्य नागरिक पूर्णपणे संतप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पाऊस किंवा वाराही नसताना, सासवड मधील शहराच्या ठिकाणी गेल्या तीन ते चार दिवसापासून वारंवार वीज पुरवठा हा खंडित होत आहे, ऐन उन्हाळ्यामध्ये सलग दोन ते तीन तास वीज गायब होत असल्याकारणामुळे, महावितरण विरोधामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड तीव्र असा संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे ,शहराला जेजुरी कडून येणाऱ्या ३३ केवी उच्च दाब वाहिनी द्वारे वीजपुरवठा होतो, या वाहिनीमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असून ,त्या नित्याच्याच बाबी झालेल्या आहेत, विशेष म्हणजे दर गुरुवारी देखभालीसाठी पाच ते सहा तास लाईट त्या बंद ठेवली जाते, तरीही इतर दिवशी वीज का जाते ,असा संतप्त सवाल व्यापारी आणि सामान्य नागरिक विचारत आहेत, असे प्रकार वारंवार घडत असल्याकारणामुळे, नागरिकांमध्ये नाराजी आहे, वीज जाण्याची वेळ ठराविक नाही त्यामुळे कोणत्याही वेळेमध्ये नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो, रात्रीच्या वेळी पूर्व सूचने शिवाय वीज जात असल्याने, लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींचे प्रचंड हाल होत असून ,तसेच स्थानिक व्यावसायिक आणि घरून काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची मोठे नुकसान होत आहे, महावितरण ने केवळ सोशल मीडियावर संदेश न देता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी सामान्य नागरिकांची म्हणजे सासवड करांची मागणी आहे सासवड मध्ये सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्या कारणामुळे, विदयमान आमदारांच्या काळामध्ये सुद्धा हे प्रकार होत आहेत, तर त्या ठिकाणी विद्युत पुरवठा ही त्या ठिकाणी अधिकारी सारखीच विद्युत पुरवठा खंडित होत आहे, यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असा मनस्ताप होत आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment