Skip to main content
शेतकऱ्याने प्राकृतिक शेतीचा स्वीकार करूनच या चळवळीचा भाग बनावे असे आव्हान भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 'समृद्ध शेतकरी, सुदृढ शेती आणि निरोगी समाज' या त्रिसूत्रीवर आधारित विकसित भारताची उभारणी शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्राकृतिक शेतीचा स्वीकार करून या चळवळीचा भाग बनावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, पुणे (दक्षिण) यांच्या वतीने रविवारी (दि. २८) नीरा येथील लक्ष्मीनारायण कार्यालयात मंगल "प्राकृतिक शेती कार्यशाळेत" आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाचेकीप्राकृतिक शेती काभारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुण्समृद्ध शेतकरी, सुदृढ शेती आणि निरोगी समाज' त्रिसूत्रीवर आधारित विकसित भारताची उभारणी शक्य.सामूहिक श्रवण करण्यात आले. शेकडो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहून पंतप्रधानांचे मार्गदर्शन ऐकले. या प्रसंगी पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास माजी आमदार अशोक टेकवडेनीरा येथे भाजप किसान मोर्चाच्या वतीने 'प्राकृतिक शेती कार्यशाळेत' मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ. तानाजीराव थोरात, अविनाश मोठे, सचिन लंबाते, जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, प्रदेश सचिव मनोज कासवा, सरचिटणीस बाळासाहेब गरुड, पुणे जिल्हा दक्षिण किसान मोर्चाचे अध्यक्ष दिग्विजय काकडे, सरचिटणीस वैभव आटोळे, उपाध्यक्ष महादेव शेंडकर, पुरंदर मंडलाध्यक्ष संजयनिगडे, महेश जी जाधव जिल्हा उपाध्यक्ष,योगेंद्र माने, अमोल यादव, माणिकराव चोरमले यांच्यासह भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक जिल्हा अध्यक्ष श्री दिग्विजय काकडे यांनी केले. सूत्रसंचालन महादेव शेंडकर यांनी केले, तर दीनानाथ मारणे जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चा यांनी आभार मानले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment