Skip to main content
पुरंदर तालुक्यामध्ये प्रामुख्याने जुगार, मटका, दारू, ताडी विक्री आणि खाजगी सावकारकीचा विळखा कायम ; तर पुरंदरची अवैध व्यवसायापासून कधी सुटका मिळणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरातील व ग्रामीण भागामधील अनेक असणाऱ्या अवैध व्यवसाय हा जोमामध्ये सुरू असून, सामान्य नागरिकांना नहाकतेचा त्रास सहन करावा लागत असल्याकारणाने, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव हा प्रत्यक्ष अनुभवास येत आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणे सह, महसूल विभागाच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे. याबद्दल सामान्य नागरिक व शेतकरी पूर्णपणे नाराज आहेत, सध्या तरी अनेक हॉटेल व ढाब्यावर बेकायदेशीर दारू विक्री होत आहे, विविध गावांमध्ये जुगार मटक्याचे क्लब सुरू असून, त्यातील ताडीच्या नावाखाली रसायन मिश्रित ताडी विकली जाते, हुक्का पार्लर या प्रकारांनाही तोंड वर काढले जात आहे, यातून तालुक्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत चाललण्याचे दिसत आहे, असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे, ग्रामीण भागामध्ये तर अवैध सावकारांच्या पाळीमुळे घट्टच अशी मिठी मारलेली दिसून येत आहे, सावकारांनी नागरिकांचे जगणे अक्षरशा मुश्किल केलेले आहे, कुंभारवळण येथील एक अनुचित प्रकार असा सावकार कडून पैसे असे घेतले असताना त्याची मुद्दल प्लस व्याज घेऊन सुद्धा त्या ठिकाणी सामान्य शेतकऱ्याची असणारी फोर व्हीलर गाडी त्या ठिकाणी हस्तगत करून स्वतः त्या ठिकाणी सासवड या ठिकाणी ठेवलेली आहे, त्यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशन येथे दोन महिन्यापूर्वी अर्ज देऊन सुद्धा गुन्हा नोंदवून सुद्धा त्या ठिकाणी त्यावर कुठल्याही प्रकारचा तपास केला जात नाही, तर त्यासाठी सामान्य शेतकऱ्याचे म्हणणे असे आहे की, विमानतळाच्या संदर्भातून या ठिकाणी आमची शेती जात असून, त्या ठिकाणी त्याची फोरविलर गाडी त्या सावकारांनी घेतलेली त्या शेतकऱ्याला परत मिळणार का? हा अनुतृत्व प्रश्न उभा राहिलेला आहे, या सावकारकीच्या विळख्यामध्ये शेतकऱ्याचं अनेक लघुउद्योजक आणि गरजू नागरिक सुद्धा फसत चाललेले आहेत, याबाबत तक्रार करूनही अनेकदा ठोस अशी कारवाई होत नसल्याचा आरोप सामान्य नागरिक व शेतकरी करीत आहेत. यासोबतच चोऱ्या, हाणामाऱ्या, दहशत अशा निर्माण करणाऱ्या टोळ्या, गुन्हेगारी, कोयतेच्या वापरामधून दहशत निर्माण केलेली जात आहे, अशा वेगवेगळ्या घटना घडवून येत आहेत, यामुळे एकंदरीतच तालुक्यामधून कायदा व सुव्यवस्थेमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, याबाबतीमध्ये सासवड पोलीस ठाण्यामध्ये नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यावर कारवाई करणार का ? यासाठी पोलीस निरीक्षकासमोर मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे .त्यामुळे पोलीस प्रशासनाने नागरिकांशी एक प्रकारे संवाद वाढवून, त्यांचा विश्वास संपादन करणे हे महत्त्वाचे आहे, तक्रारीवर तात्काळ कारवाई करणे कायद्याचा धाक दाखवून त्या ठिकाणी न्याय देणे महत्त्वाचे आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशा प्रकारचे अवैध व्यवसायांना एक प्रकारे आळा बसेल अशी अपेक्षा तालुक्यामधून सामान्य नागरिक व शेतकरी यांच्यातून व्यक्त केली जात आहे, सासवड पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसायांना खपवून घेतले जाणार नाही ,असे त्या ठिकाणी सामान्य नागरिकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी हमी दिलेली आहे. सामान्य नागरिक व शेतकरी यांनी कोणालाही न घाबरता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी किंवा त्यांनी स्वत: मला जरी सांगितले की, किवा स्वतः माझ्याशी संपर्क करावा, अवैध खाजगी सावकारा विरोधामध्ये सामान्य नागरिक व शेतकरी यांनी तक्रार दाखल करावी त्यांच्या विरोधामध्ये कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संतोष घोळवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment