Skip to main content
“अनुभवांचे जीवनात रूपांतर झाले तरच खरी अनुभूती” – बी. आर. शंकरानंद ण सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय शिक्षण मंडळाच्या युवा गतिविधी विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय ‘अनुभूती शिबिर ४.०’ चे उद्घाटन राणी लक्ष्मीबाई सैनिक स्कूल, पिरंगुट (पुणे) येथे उत्साहात संपन्न झाले. ३ ते १३ जून या कालावधीत आयोजित या शिबिराची संकल्पना “आत्मवत् सर्वभूतेषु” अशी असून, देशभरातील १११ युवक-युवती, संशोधक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले आहेत. यामध्ये ६५ युवक आणि ४६ युवतींचा समावेश आहे.उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटन मंत्री बी. आर. शंकरानंद म्हणाले की, केवळ अनुभव प्राप्त करणे पुरेसे नसून त्या अनुभवांचे आत्ममंथन करून त्यांना जीवनात उतरविणे हीच खरी अनुभूती आहे. अनुभवांतून शिकत स्वतःचे सातत्याने परिष्करण करणे हीच जीवनाची खरी साधना असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ माहिती आणि ज्ञान प्रदान करणे नसून व्यक्तीमधील सुप्त गुण, क्षमता आणि शक्यता यांचे जागरण करणे हे आहे. व्यक्तिमत्त्व विकास, चारित्र्यनिर्माण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “राष्ट्रनिर्माणाचा पाया व्यक्तिनिर्माणात आहे,” असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रदीप रावत यांनी युवकांना राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. भारताची युवा शक्ती ही देशाची सर्वांत मोठी संपत्ती असून तिचा सकारात्मक उपयोग राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा, असे ते म्हणाले.युवा गतिविधी प्रमुख अमित रावत यांनी शिबिराची प्रस्तावना मांडली, तर पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष डॉ. रवि चिटणीस यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत कुलकर्णी यांनी केले, तर विजय कुलकर्णी यांनी आभार मानले.उद्घाटन सत्रातून सहभागी युवकांसमोर आत्मबोध, राष्ट्रबोध आणि व्यक्तिमत्त्व विकासाची वैचारिक दिशा स्पष्ट झाली असून, आगामी शिबिरासाठी एक सशक्त आणि प्रेरणादायी पायाभरणी करण्यात आली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment