Skip to main content
पुरंदर तालुक्यातील नाझरे कप येथील कर्मचारी संदीप नाझीरकर यांनी मनमानी पद्धतीने शेतकऱ्याचा रस्ता अडवला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नाझरे कप ता. पुरंदर येथील ग्रामपंचायत कर्मचारी संदीप रामचंद्र नाझीरकर यांनी मनमानी पद्धतीने आणि अरेरावीची भाषा करून शेतकऱ्याची अडवणूक करून रस्त्याची केलेली आहे. शेतकऱ्यांना येजा करण्यासाठी जो काही रस्ता वापरत असताना, त्यावर दगड, माती, काटे राडारोडा टाकून गेली एक वर्ष झाली तो रस्ता बंद केला आहे. यासंदर्भात संदरील ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक ,सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता, सदरील ग्रामपंचायत तिकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य या शेतकऱ्यांना मिळत नाही, उलट अधिकारी सांगत आहे की, नाझीरकर यांना रस्ता खुला करून शेतकऱ्यांनी द्यावा, असे सांगतात हा कसला प्रकार म्हणायचा? तरी हा कर्मचारी कुणाचे ऐकत नाही, रस्ता शेतकऱ्यांना खुला करून देत नाही, उलट शेतकऱ्यांना दमदाटी शिवीगाळ महिलांना अर्वाच्य भाषा वापरून धमकी देणे गावातून हाकलून काढेल, माझी कोणी वाकडे करू शकत नाही ,अशा धमक्या तो कर्मचारी शेतकऱ्यांना करत आहे ,या संदर्भात पंचायत समिती पुरंदर तथकालीन गटविकास अधिकारी पंकज शेळके यांना त्यावेळी निवेदन दिले होते, त्यावेळी त्यांनी ग्रामसेवकांना आदेश देऊन सहकार्य करण्यासाठी मदत केली होती, परंतु ग्रामसेवक यांनी कुठलीही मदत केलेली नाही ,पुरंदर पंचायत समिती ग्रामसेवक व कर्मचारी यांना पाठीशी घालत आहेत, ग्रामसेवक व कर्मचारी यांचा मनमानी कारभार शेतकऱ्यांना रस्ता अडवत आहेत, आताच्या घटविकास अधिकारी प्रणोती श्री श्रीमाळ या वर काय निर्णय घेणार ? हा प्रमुख प्रश्न आहे ,तरी महादेव गणपत बारभाई, अमोल महादेव बारभाई, अमर महादेव बारभाई यांनी गट विकास अधिकारी पुरंदर, पोलीस निरीक्षक जेजुरी, ग्राम पंचायत नाझरे क प तहसीलदार येथे निवेदन दिलेले आहे, त्यावर सामान्य या शेतकऱ्याला पुरंदर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ या काय न्याय देणार का ? असे सविस्तर वृत्त माहिती महादेव बारभाई यांनी सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment