आई गेली... पण लेक-जावयांसाठी आजही उघडेच आहेत मायेचे माहेर!• पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी रुजविलेली अधिक मासाची परंपरा• ममता बाल सदनात 7 जूनला "अधिक मासाचे वाण – लेकजावयांचा सन्मान"भावनिक सोहळा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: स्वतःच्याच आयुष्यात पेक्षा, भूक आणि संघर्षाचे असंख्य चटके सोसलेल्या एका आईने हजारो अनाथ मुलांच्या आयुष्यात मायेचा दिवा पेटवला. जिच्या पदरात दुःखच दुःख आले, त्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी मात्र आपल्या मुलींच्या वाट्याला आनंद, सन्मान आणि माहेरची ऊब यावी यासाठी आयुष्य वेचले. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या मायेचा ओलावा अजूनही जिवंत आहे. याच मायेचे दर्शन पुन्हा एकदा रविवार, दि. ७ जून रोजी "अधिक मासाचे वाण – लेकजावयांचा सन्मान" भावनिक सोहळ्यात होणार आहे. ममता बाल सदन, कुंभारवळण (सासवड, ता. पुरंदर) येथे होणार आहे.१९९२ साली माईंनी स्थापन केलेल्या या संस्थेत आजही अनाथ, निराधार, निराश्रित आणि गरजू मुलींचे संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनाचे कार्य सुरू आहे. सध्या ८० मुली येथे शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, आजपर्यंत तब्बल २२० मुलींची थाटामाटात लग्ने लावून त्यांना संसारात स्थिर करण्यात आले आहे. त्यामुळे आज माईंच्या कुटुंबात २२० लेक-जावई आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात माहेरवाशिणींना सन्मानाने बोलावून वाण देण्याची परंपरा आहे. मात्र आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलींना माहेर कुठले? हा प्रश्न माईंना कायम अस्वस्थ करायचा. म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थेतून संसारात गेलेल्या मुलींना अधिक मासात सन्मानाने बोलावून त्यांना माहेरची माया देण्याची अनोखी परंपरा सुरू केली.यावर्षीही "अधिक मासाचे वाण – लेकजावयांचा सन्मान" या संकल्पनेतून लेकी व जावयांना संस्थेत निमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी जावयांना नवीन पोशाख, तर लेकींना साडी-चोळी, जोडवे, तामणदीप, निरंजन,३३ अनारसे आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे उपस्थित असलेली प्रत्येक मुलगी स्वतःला अनाथ समजत नाही. कारण माईंनी त्यांना केवळ आसरा दिला नाही, तर आई-वडिलांचे प्रेम दिले. त्यांच्या विवाहानंतरही हे नाते तुटले नाही. उलट प्रत्येक अधिक मासात हे माहेर पुन्हा उघडते आणि लेकी-जावयांच्या स्वागताने संस्था आनंदाने फुलून जाते. "आपल्याला आई-वडील नाहीत, आपल्याला विचारणारे कोणी नाही, असा विचार या मुलींच्या मनात कधीच येऊ नये, हीच माईंची शिकवण आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे आहोत," असे पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र व ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांनी सांगितले."प्रत्येक वडील अधिक मासात आपल्या लेकीला सन्मानाने माहेरी बोलावतो. आम्हीही माईंच्या प्रत्येक लेकीला तितक्याच प्रेमाने बोलावतो. समाजातील दानशूर व्यक्ती, मान्यवर आणि संवेदनशील नागरिकांनी या मुलींचे पालक म्हणून उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद द्यावेत," असे आवाहनही त्यांनी केले. आजच्या धावपळीच्या आणि नातेसंबंध दुरावत चाललेल्या काळात, आई गेल्यानंतरही तिच्या मायेची परंपरा जिवंत ठेवणारे हे चित्र विरळच म्हणावे लागेल. माईंच्या स्मृती, त्यांच्या संस्कारांचा वारसा आणि शेकडो लेकींच्या डोळ्यात दाटलेले माहेरपण यांचा संगम असलेला हा अधिक मास सोहळा अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरणार आहे.बॉक्सलेक-जावयांसाठी विदर्भाच्या पुरणपोळीची खास मेजवानीअधिक मास सोहळ्यानिमित्त सुमारे 800 जणांसाठी विदर्भाच्या पारंपरिक पुरणपोळीच्या भोजनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. पुरणपोळीसोबत दूध, आमटी-भात, कुरडई, पापड आदी पारंपरिक पदार्थांची रेलचेल असणार आहे. माईंच्या प्रत्येक लेक-जावयाचा मानपानाने सत्कार व्हावा यासाठी संस्थेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. माहेरच्या प्रेमाची ऊब आणि आदरातिथ्याची परंपरा जपत आहे.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.