पुरंदर तालुक्यातील संत सोपानदेव पालखीचे 12 जुलै रोजी प्रस्थान ; तर संत सोपान देवस्थानच्या वतीने जयंत अशी तयारी सुरू एडवोकेट trygun गोसावी यांची माहिती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पंढरपूर शेत्रातील आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या सोहळ्याची तयारी जोरदार सुरू असून, आणि सर्व संतांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर झाल्या असून, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू श्री संत सोपानदेव महाराज यांची पालखी सासवड येथून रविवारी दि.12 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मंदिरातून प्रस्थान करणार आहे, संत सोपानदेव देवस्थानच्या वतीने जयंत तयारी सुरू असल्याची माहिती पालखी प्रमुख एडवोकेट त्रिगुण गोसावी यांनी दिली आहे .पालखी प्रस्थान सोहळा रविवारी दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संत सोपानदेव मंदिराच्या वाड्यातून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हजारो भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ केला जाईल, दुपारचा विसावा पिंपळे येथे पांगारे येथे रात्रीचा मुक्काम होईल, सोमवारी दिनांक 13 जुलै रोजी पांगारे येथून प्रस्थान सुरू झाल्यानंतर यादव वाडी येथे सकाळचा विसावा होईल व परिंचे ते दुपारचा नैवेद्य होईल तर मांडकी भैरवनाथ मंदिर येथे रात्रीचा मुक्काम मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी मांडकी ओलाढून सकाळचा विसावा जेऊर पिंपळे खुर्द येथून निरा येथे दुपारचा नैवेद्य होईल तर नींबूत येथे मुक्काम बुधवार १५ जुलै रोजी निंबूत येथून प्रस्थान सुरू होऊन ,नींबूत छपरी वागळवाडी मार्गे सोमेश्वर नगर तालुका बारामती येथे पहिले गोल रिंगण होईल व मुक्काम होईल गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सोमेश्वर नगर करंजे पूल येथे सकाळचा विसावा होईल दहा फाटा येथे दुपारचा नैवेद्य वडगाव निंबाळकर येथे दुपारचा विसावा होईल व कोऱ्हाळे बुद्रुक येथे रात्रीचा मुक्काम होईल शुक्रवारी दिनांक 17 जुलै रोजी कोराळे बुद्रुक येथून कोकाटे पूल येथे सकाळचा विसावा होईल पणदरे येथे दुपारचा नैवेद्य तर विसावा माळेगाव बुद्रुक कोकाटे महाराज वस्ती आणि सायंकाळचा मुक्काम बारामती शारदा प्रांगण येथे होईल, शनिवारी दिनांक 18 जुलै रोजी बारामती येथून प्रस्थान होईल सकाळचा विसावा मोतीबाग आणि दुपारचा नैवेद्य पिंपळी येथे आणि बकरी रिंगण, दुपारचा विसावा भवानी नगर.सणसर बेलवाडी फाटा येथे व लासुरने येथे मुक्काम होईल रविवारी 19 जुलै रोजी लासुरने येथून लाल पुरी येथे सकाळचा विसावा कळंब येथे दुपारचा नैवेद्य तर निमसाखर येथे दुपारचा विसावा होईल आणि रात्री निर्वांगी येथे पालखी तळावर मुक्काम सोमवार दिनांक 20 रोजी निर्वांगी तरंगे वस्ती येथून रेडणी येथे सकाळचा विसावा दुपारचा नैवेद्य लाखेवाडी येथे तर (नीर निमगाव चौक येथे दुपारचा विसावा आणि अकलूज राम मंदिर येथे रात्री मुक्काम मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी अकलूज येथून बाबीर पूल महाळुंगे येथे सकाळचा विसावा असेल श्रीपुर येथे दुपारचा नैवेद्य तर माळ खांबी येथे दुपारचा विसावा होईल आणि बोंडले येथे रात्रीचा मुक्काम होईल. बुधवार 22 जुलै रोजी बोडले येथे दुपारचा नैवेद्य होऊन बोंडले टप्पा येथे श्री संत सोपान देव महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट सोहळा होईल तर भंडी शेगाव येथील पालखी तळावर मुक्काम गुरुवारी 23 जुलै रोजी भंडी शेगाव येथे प्रस्थान होईल दुपारी वाखरी येथे उभे रिंगण पालख्यांच्या भेटींचा सोहळा असेल तसेच रात्रीचा पालखी मुक्काम शुक्रवारी दिनांक २४ जुलै रोजी सर्व पालख्यांची वाखरी जवळ उभे रिंगण पंढरपूर येथे आगमन होईल ,24 जुलै 2026 ते बुधवार 29 जुलै दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम श्री संत सोपानदेव महाराज पालखी मंडप तांबडा मारुती मंदिरा नजीक येथे राहील. शनिवारी 25 जुलै एकादशी सकाळी सहा वाजता नगर प्रदक्षिणा व श्रीचे चंद्रभागा स्नान होईल, बुधवारी 29 जुलै सकाळी.साडेपाच वाजता गोपाळपूर येथे काला व विठ्ठल रुक्मिणी भेट आणि परतीचा प्रवास सुरू होईल ,अशी सर्व माहिती संत सोपानदेव देवस्थानचे प्रमुख एडवोकेट त्रिगुण गोसावी महाराज यांनीही सर्व सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.