Skip to main content
पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित शेतकरी सोमवार किंवा मंगळवार या दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार ; भूसंपादन प्रक्रियेमध्ये चालू असलेल्या भ्रष्टाचाराची तक्रार करणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: विमानतळ भूसंपादन प्रक्रियेमध्ये खोट्या सर्व नोंदी दाखवून, अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाढीव मोबदला लाटण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रकार सध्या विमानतळाच्या संदर्भात चालू आहे, त्याचे सर्व पुरावे हे बाधित शेतकरी यांच्याकडे आहेत, ते घेऊन येत्या सोमवार किंवा मंगळवार या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती बाधित शेतकऱ्यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. नवीन असा खुलासा विहिरी, बोरवेल, झाडे, शेड अशा अधिसूचना निघाल्यानंतर मोबदला वाढीसाठी गुंतवणूकदारांनी केलेले प्रकार रीतसर नोंदीत धरले जात आहेत, याच्या सर्व सॅटेलाईट इमेज या बाधित शेतकऱ्याकडे आहेत, त्या आणि इतर पुरावे सदरील मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत, खोट्या नोंदी व सर्वांचा प्रकार भूसंपादन प्रक्रियेमधील जमिनीचे चुकीचे मोजमाप, खोट्या नोंदी, बनावट दस्तऐवज तयार करून, काही मोजक्या लोकांनी जास्त मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा बाधित शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर काही ठिकाणी तर विहीर, झाडे झुडपे,बोअरवेल,शेततळी,पाईपलाईन हे लावली नाहीत त्याचा मनसंताप शेतकरी याना होत आहे. आत्तापर्यंत सात गावामध्ये असा प्रकार झालेला आहे, ज्या शेतकऱ्यांची शेतामध्ये पहिली झाडे झुडपे, त्या ठिकाणी शेड होते, परंतु संमती दिल्यानंतर त्या ठिकाणी मोजमाप करण्यासाठी ज्यावेळेस आले त्याच्या आदल्या दिवशी काही ठिकाणी झाडे ,शेड साठी गावात उभारण्यात आली त्याचा मोबदला हा आता सध्या जो काही शेतकऱ्यांना मिळत आहे ,त्या शेतकऱ्यांच्या मोबदल्या मधून झाडे झुडपे, शेड लावलेले पेमेंट शेतकऱ्याकडून उकळण्याचा प्रकार सर्वात जास्त प्रमाणात चाललेला आहे, त्यासाठी शेतकऱ्यांची मागणी अशी की, भूसंपादनामध्ये पारदर्शकता ठेवावी, खऱ्या बाधित शेतकऱ्यांना न्याय मोबदला द्यावा, खोटे सर्वे व खोट्या नोंदी रद्द कराव्यात, दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल का ? आत्तापर्यंत झाली नाहीत, तर आत्ता पयॅत सावळा गोंधळ चाललेला आहे, त्यावर कधी फौजदारी गुन्हे दाखल करणार ? येथून पुढे काय होणार ? पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने शेतकरी बाधित होणार असून, मात्र भूसंपादन प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून ,येत्या सोमवार किंवा मंगळवार या दिवशी शेतकरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, त्यानंतर या आंदोलनाला अजून तीव्र स्वरूप येण्याची शक्यता आहे, अशी बाधित शेतकरी यांनी ही व्यथा आपली प्रतिनिधीला सांगितली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment