मोरगाव मयुरेश्वरनगरीत सुवर्णपुष्प संस्था महाराष्ट्र आयोजित १०१ बटुंचा दिव्य उपनयन संस्कार महायज्ञ दिमाखात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मोरगाव, जि. पुणे : सुवर्णपुष्प संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने एक दिवस समाजासाठी या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला १०१ बटूंचा सामुदायिक व्रतबंध उपनयन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. संस्कार, परंपरा आणि समाजभावना यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.नुकताच मोरगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास सुमारे दहा हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती लाभली. सकाळी ६ वाजता वेदघोषांच्या निनादात विधींना प्रारंभ झाला, तर सकाळी भव्य मिरवणुकीने वातावरण उत्साही झाले. दिवसभर विविध कार्यक्रमांनी सोहळा रंगतदार झाला.या कार्यक्रमात १०१ बटूंचा उपनयन संस्कार, सुवर्णजोडी गौरव समारंभ, वधू-वर पालक परिचय मेळावा आणि आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.गरजू कुटुंबांनाही या उपक्रमात सहभागी होता यावे, यासाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले होते, तसेच काहींसाठी विनामूल्य सुविधाही देण्यात आल्या. त्यामुळे हा उपक्रम अधिक सर्वसमावेशक ठरला.गुरुवर्य अनुपसिंह दत्तात्रय दीक्षित वीरकर, नमो गुरुजी, पुणे, श्याम पंडित, साकतकर, विवेक दीक्षित, धायरी, न्युमेश वेदपाठक, पुणे, अवधूत पंडित, शेळगाव, सत्यवान महामुनी, पुणे, ज्ञानेश्वर दीक्षित, वीरकर, डॉ. स्वानंद पंडित आदी गुरुजनांच्या वेदपठण व मंत्रोच्चारांनी वातावरण भारावून गेले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुवर्णपुष्प परिवारातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिले. विशेषतः सुवर्णपुष्प संस्था महाराष्ट्र चे संस्थापक शोभा महामुनी व यांच्या विशेष योगदानातून हा दैदीप्यमान सोहळा यशस्वी झाला! योगेश महामुनी सर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. सुनील पंडित सर यांनी आभार मानले. स्नेहभोजन व्यवस्थेसाठी दत्तात्रय वेदपाठक पिंटू मामा, महेश दीक्षित आणि मधुसूदन दीक्षित सुवर्णपुष्प आम्ही मोरगावकर यांचे विशेष योगदान लाभले मोहिनी दीक्षित नूतन धर्माधिकारी, सुलभा वेदपाठक.,महिला राज्याध्यक्ष मनीषा पोद्दार., तेजश्री वेदपाठक, उज्वला वेदपाठक आशा हजारो कार्यकर्त्यांनी सोहळा यशस्वीतेसांठो परिश्रम घेतले! विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये शशांक पालकर, संचालक, कराड अर्बन बँक, प्रमोद वेदपाठक, भारत वेदपाठक, ज्योती वेदपाठक, उप अभियंता, पुणे मनपा, किशोर पंडित, परशुराम पंडित आदींची उपस्थिती लाभली.यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्या दानशूर, दाते, मार्गदर्शक, गुरुजन, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिक यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. आपले सहकार्य हीच या संस्कारयज्ञातील अमूल्य समिधा आहे, अशा शब्दांत सर्वांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच हजारो कार्यकर्ते स्वयंसेवक यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहयोग दिल्यामुळेच हा सोहळा यशस्वी झालेला आहे, *“हा भव्य दिव्य सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील सोनार समाजासाठी ऐतिहासिक क्षण – एकजुटीची ताकद दाखवणारा भव्य विक्रम!”* *“सुवर्ण पुष्प परिवाराचे हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन … संघटित होऊन … इतिहास घडवलेला आहे !” श्री संत नरहरी सेवा कार्य केलेले आहे.* अशी भावना संयोजक जगदीश महामुनी यांनी व्यक्त केली. वेद घोषांच्या पावन निनादात , संस्काराच्या सुवर्ण क्षणी 'सुवर्ण पुष्प संस्था ' आयोजित १०१ बटुंच्या 'उपनयन सोहळ्याचा ' हा दिव्य सोहळा आतषबाजीने उजळून निघाला .या मंगल कार्यासाठी अहोरात्र तन, मन, धन , आणि श्रम अर्पण केले त्यांचे 'आभार ' मानावे तेवढे थोडेच आहे....सुवर्णपुष्प परिवाराच्या सहकार्याच्या प्रत्येक उस्फुर्त उर्जेने या सोहळ्याला तेजोमय प्रभा लाभली.ज्यांच्या नियोजन कौशल्याने कार्याला दिशा मिळाली व ज्यांच्या परिश्रमाने आयोजनाला पुर्णत्व आले आणि ज्यांच्या सदभावनेने या उपक्रमाला 'आत्मा' प्राप्त झाला त्या सर्व सहृदय, सज्जन, कर्तृत्ववान, व्यक्तीच्या प्रती आम्ही कृतज्ञतेची फुले अर्पण करतो...*आपले सहकार्य म्हणजेच या संस्कार यज्ञातील अमुल्य 'समिधा' आहेत.ज्याच्यामुळे हा यज्ञ अधिक पवित्र अन् प्रभावी ठरला.सर्वांचे शतशः आभार अशाही उत्स्फूर्त भावना बटुंचे पालकांनी व्यक्त केल्या!कार्यक्रमादरम्यान सर्वांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी अन्न वाया गेल्याची खंत व्यक्त करत अन्न हे पूर्ण ब्रह्म या संस्काराची जाणीव ठेवण्याचे आवाहन आयोजकांनी केले.हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी न राहता, एकजूट, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रभावी उदाहरण ठरला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत तो प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.