समाज जीवनातील वास्तव पुस्तकरूपात शब्दबद्द करण्याची गरज : फ.मु.शिंदे राज्यस्तरीय दोन दिवसीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न  सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :  "समाज जीवनातील घडामोडी शब्दात पकडून पुस्तक रूपाने प्रसिद्ध होतात. तेच सत्य वास्तव हा खरा इतिहास असतो असे समाज घडविणारे सृजनशील साहित्य लिहिणाऱ्या लेखकांची खरी गरज आहे." असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक प्रा. फ. मुं. शिंदे यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय पाचवे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दि.२३ व दि.२४ मे २०२६ रोजी दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी शिंदे बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, स्वागताध्यक्ष डॉ.रोहन खवटे, निमंत्रक डॉ.भरत खळदकर व सहनिमंत्रक रामचंद्र नातू, मराठी चित्रपट सैराट फेम अभिनेता सुरज पवार, अभिनेत्री कोमल शिंपी, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघ समन्व्यक ह.भ.प संजय वाबळे, विनोद जगताप, कैलास शेलार, डॉ.अशोक जाधव, प्रमोद ढमाले, संभाजी फडके, एकनाथ अडसूळ, भाऊसाहेब फडके, तानाजी केकाण, अरुण यादव, बाळुतात्या यादव, चंद्रकांत बोरावके आदी उपस्थित होते.भीमथडी मराठी साहित्य संमेलनाची सुरवात बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी, साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, लोकरंग व सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन आणि समारोप असे भरगच्च कार्यक्रमाने साहित्य संमेलन रंगले. जानकर म्हणाले, "ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व त्यांचे सहकारी हे अनेक अडचणी सहन करीत या साहित्य मेळाव्याचे आयोजन करतात. कोणतेही शासकीय अनुदान नसल्याने त्यांची ताऱेवरची कसरत होते. नवोदित कवी, लेखक, साहित्यिक, कलावंत त्यांना हे खुले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. आम्ही सत्तेत असू की नसो, आम्ही नेहमी पाठीशी उभे राहून आपणास सहकार्य करू आणि या साहित्य चळवळीस पाठबळ देऊ."दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल म्हणाले, "दौंड तालुका हा नेहमी विकासकामात आघाडीवर आहे. भीमथडी मराठी साहित्य संमेलन ही साहित्य चळवळ अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे. साहित्य व सांस्कृतिकदृष्ट्या तालुका सक्षम करण्यासाठी भीमथडी मराठी साहित्य संमेलन महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यांना कायम मदत करू."ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव म्हणाले, "साहित्य व मराठी संस्कृती मजबूत झाल्याशिवाय समाज हा सक्षम होणार नाही त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य भवन हे दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी पाच एकरात भव्य दिव्य स्वरूपात साकरण्यात येणार आहे. यामध्ये लोकसहभागातून व शासकीय मदतीने हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत यांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळवण्यासाठी पाठपुरावा करू, मराठी साहित्य भवनात भव्य सांस्कृतिक सभागृह, सांस्कृतिक उद्यान, साहित्यिकांसाठी आश्रम, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असे विविध उपक्रम या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत."साहित्य संमेलनाची सुरुवात बोरमलनाथ देवाला भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक ह भ प संजय वाबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महादेव जानकर, अरुण यादव, माजी न्यायाधीश वसंत पाटील उपस्थित होते.यावेळी भीमाथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय डाडर, सुशांत जगताप, अरविंद जगताप, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे, विठ्ठल थोरात, आनंदा बारवकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले.आभार भीमाथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे सचिव दिपक पवार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.