Skip to main content
पुरंदर तालुक्यातील तक्रारवाडी टोल नाक्यावर वसुली थांबवण्यासाठी मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम अपूर्ण असताना, तक्रारवाडी तालुका पुरंदर येथील टोल नाक्यावर वसुली सुरू झाल्याने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे, नियमबाह्य वसुली तातडीने थांबून स्थानिकांना पूर्ण माफी द्यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी टोल नाक्यावर व्यवस्थापकांना निवेदन देत निदर्शने केली ,पुरंदर मधील सर्व खाजगी व्यावसायिक व शेती पूरक वाहनांना टोल मधून पूर्ण सूट मिळावी, सेवा रस्ते दिशादर्शक फलक आणि वृक्षारोपणा सारखी कामे पूर्ण होण्यापूर्वीच, वसुली सुरू करणे हा कायदेशीर दरोडा आहे, इत्यादी वाहने, महिला ,चालक, दिव्यांग आणि आजी-माजी सैनिकांना नियमानुसार सवलत द्यावी, पत्रकार यांना सुद्धा सवलत द्यावी, टोल नाक्यावर पिण्याचे पाणी, शौचालय आणि टोईग फॅन ची माहिती देणारे फलक लावण्याची मागणी केली, या आंदोलनात तालुकाप्रमुख अभिजीत जगताप, संतोष भोसले, राजाभाऊ शिरसागर, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment