Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर धरण पाणीपुरवठा योजनेवर वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा आणि त्यामुळे विस्कळीत होणारे जल नियोजनाचे चक्र आता थांबणार आहे, या समस्येवर कायमस्वरूपी पर्याय म्हणून शनिवारी दि. 9 रोजी 750 केवी क्षमतेचा जनरेटर बसवण्यात आलेला असून, यामुळे शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत होणार आहे, वीर धरण योजनेची जॅकवेल सातारा जिल्ह्यात येते ,तर पाणी पुरंदर तालुक्यातील कांबळवाडी पंप हाऊस पर्यंत आणले जाते, तेथून पुन्हा उपसा करून पाणी पांगारे घाटा माथ्यावरील टाकीत साठवले जाते आणि तिथून सायफर पद्धतीने सासवड पर्यंत पोहोचते, या दरम्यान सातारा आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यातील वीज कपातीच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने, भार नियमात अडचण निर्माण होते, त्यात गराडे आणि घोरवडी पाझर तलावातील पाणी बंद झाल्याने, शहराची दररोजची एक कोटी लिटर पाण्याची गरज पूर्णपणे वीर योजनेवर अवलंबून आहे, याबाबत पाणीपुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे यांनी सांगितले की, या योजनेवर 240 अश्वशक्तीचे तीन पंप कार्यरत आहेत, त्यापैकी एका अतिरिक्त पंपाला हा 750 केवीचा जनरेटर जोडण्यात आलेला आहे, आता महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला तरीही जनरेटर च्या साह्याने उपसा सुरू राहील, याप्रसंगी नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप, गट नेते अजित जगताप, नगरसेवक राजन जगताप, प्रदीप राऊत, मयूर चौखंडे, नगरसेविका प्रियंका साकेत जगताप, स्मिता सुहास जगताप, लीना सौरभ वढणे व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment