Skip to main content
जेजुरीतील जिजामाता विद्यालयाची उत्कृष्ट यशाची सुवर्ण नोंद(तृप्ती गणेश खळदकर 89.67 टक्के गुणांसह विद्यालयात प्रथम) सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) : जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जेजुरी या विद्यालयाने इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विज्ञान व वाणिज्य शाखेतील शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे.विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखांमध्ये 100 टक्के निकाल लागल्याने, विद्यालयाच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.विज्ञान शाखेत खैरे दिक्षा संपत हिने 88 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला टेकवडे उर्वशी शरद (72.33%) हिने द्वितीय, तर विभाड साक्षी मोहन (71.17%) हिने तृतीय क्रमांक मिळवला.वाणिज्य शाखेत खळदकर तृप्ती गणेश हिने 89.67 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. जगताप धनश्री पोपट (84.50%) द्वितीय, तर गरुड चेतन नरसिंग (78.33%) तृतीय क्रमांकावर राहिला.कला शाखेत माने ज्ञानेश्वरी मल्हारी हिने 82.17 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला माने सानिका काकासो (80.50%) द्वितीय, तर ताडे श्रावणी श्याम (80.33%) हिने तृतीय क्रमांक पटकावला.या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “परिश्रम, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यशाची हमी देतात,” असे ते म्हणाले.या यशामागील खरे शिल्पकार म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थेचे अध्यक्षा आनंदी(काकी) जगताप, पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व संस्थेचे सचिव, माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप, भारतीय प्रशासन सेवा अधिकारी व संस्थेचे विशेष सल्लागार डॉ. राजेंद्र(बापू) जगताप, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. एम. एस. जाधव, सहसचिव दत्तात्रय गवळी, संस्थेच्या समन्वयिका सोनाली शिंदे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा व संस्थेच्या विश्वस्त राजवर्धनी जगताप,भारती विद्यापीठाच्या संचालिका व संस्थेच्या विश्वस्त डॉ. अस्मिता जगताप, व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे व रवींद्र पंत जगताप यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना ज्युनिअर विभाग प्रमुख किरण मोडक, शोभा शिंदे, मधुसूदन जगताप, पांडुरंग भांड, संदीप भोंग, जयसिंग वसावे, सचिन निकुडे, पूनम बाठे, अमोल राणे, श्वेतांबर बेलसरे,वैष्णवी पवार, सुरेश शिंदे, सोनाली कोसे यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पुरंदर तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल 92.06 लागला आहे पुरंदर तालुक्यामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 2388 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते परीक्षेसाठी 2358 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते विशेष प्राविण्यश्रेणीमध्ये 93 विद्यार्थी,प्रथम श्रेणीमध्ये 387 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 1,296 विद्यार्थी व पास श्रेणीमध्ये 395 विद्यार्थी एकूण 2171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तालुक्यातील सर्व मान्यवरांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment