Skip to main content
"झाडे लावा झाडे जगवा" उष्माघातापासून स्वतःचे बचाव करा सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सध्या सर्वत्र उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण आहेत.सध्या तापमान 40°c पेक्षा अधिक आहे, उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाताना नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करणे आवश्यक आहे. नागरिकांनी बाहेर पडताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा, पातळ सैल, सुती कपडे घाला सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी छत्री/ टोपी /टावेलने आदींनी आपले डोके झाका. अनवाणी बाहेर जाऊ नका, दुपारी बारा ते चार या वेळेत बाहेर जाऊ नये. जास्त करून ज्येष्ठ नागरिकांनी उष्माघातापासून आपला बचाव करावा. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना कधीही उन्हात पार्क केलेल्या वाहनात सोडू नका. सध्या सर्वत्र शहरी, भागात झाडे नष्ट होत चालली आहेत, त्यामुळे सावली गारवा पासून मनुष्य दूर चालला आहे, किमान उरलेली झाडे तरी सुरक्षित ठेवावी व नवीन झाडे लावण्याचा संकल्प करावा. सासवड नगरपरिषद राबवत असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानात प्रत्येक सोसायट्यांनी, मंडळांनी, बचत गटांनी, शासकीय कार्यालयांनी,वृक्षप्रेमींनी भाग घेऊन नगर परिषदेमध्ये आपली नोंदणी करावी व आपापल्या सोसायट्यांमध्ये, परिसरामध्ये मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेने नगर परिषदेच्या सहकार्याने किमान पाच ते दहा झाडे लावून झाडे जगवण्याचा संकल्प करावा जेणेकरून भविष्यात उष्ण तापमानापासून आपण स्वतःला व येणाऱ्या पिढीला वाचवू शकतो. चला तर संकल्प करूया येणाऱ्या जून पासून प्रत्येकांनी " झाडे लावूया व झाडे जगवूया"अस मोहन चव्हाण सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी सासवड नगरपरिषद यांनी ही सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment