पुरंदर तालुक्यातील विमानतळाला जमीन न देण्यासाठी कुंभारवळण ग्रामस्थ ठाम ! कायदेशीर मार्गाने पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांचा पूर्णपणे निर्धार ! भूसंपादन हे बेकायदेशीर असल्याचा दावा सक्षम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कुंभारवळण ता. पुरंदर येथील वस्तीवरील बैठकीमध्ये प्रामुख्याने विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्याच्या प्रक्रियेला कुंभारवळण गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे, गावातील शेतकरी बांधवांची बैठक घेऊन, पुढील भूमिका ठरविण्यात आली असून, सप्टेंबर महिन्यामध्ये गावातील संमती 18 सप्टेंबर पर्यंत 75 टक्के होती, त्याचा उलगडा गावातील विमानतळाला एजंट म्हणजे दलाल हा कुंभारवळण गावचे सांगत होता की,75%संमती आहे. परंतु गावातील शेतकरी बांधवांनी कोर्टाच्या वकिलामार्फत स्टॅम्प वरती पूर्णपणे माहिती घेऊन 24 व 25 सप्टेंबर रोजी संमती फक्त जमीन मोजणीसाठी 72% दोन दिवसात दिली होती, त्यात माहिती अधिकारात जाऊन माहिती घेतली असता पहिली 75 टक्के व नंतरची 72 टक्के मिळून 147% कुंभारवळणची जमीन भूसंपादन करण्यासाठी संमती झाली होती, त्याची पूर्णपणे माहिती घेऊन त्या ठिकाणी सुरुवातीची संमती गावातील ही फक्त 22% माहितीच्या अधिकारांमध्ये निघाली ती चुकीची माहिती पुरवून जी संमती दाखवली हीच कुंभारवळणची खूप मोठी चूक केली, प्रत्यक्षात 22 टक्के व नंतरची 72 टक्के मिळून 94% संमती झाली परंतु आता जी संमती पत्र बनून देणे चालू आहे, त्यात सुद्धा बहुतेक बऱ्याच ठिकाणी विमानतळ बाधित गावात नव्याने केलेल्या झाडे ,झुडपे शेडची नोंद सुद्धा नवीन नोंदी केलेल्या आहेत ,अधिकाऱ्याला हाताशी धरून जो काही प्रकार चालू आहे, त्याची प्रथम चौकशी करून, त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ,म्हणजे काही क्षमता मध्ये बहात्तर टक्के संमती असणारी ही फक्त जमीन मोजणीला संमती दिली होती, ती भूसंपादन विमानतळाला आमची अजिबात संमती नाही सक्तीने जमीन घेता येत नाही, गोड गोड अधिकारी बोलून जमीन लाटण्याचा प्रकार जो चालू आहे, त्यावर भूसंपादित करण्याच्या प्रक्रियेला कुंभारवळण गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे, प्रामुख्याने ऍडव्होकेट स्वप्निल होले, अडवोकेट शैलेश जगताप ,विकास खळदकर, मनीष हगवणे, नाना कुंभारकर, अशोक कुंभारकर, गणेश काशिनाथ मोरे यांनी विमानतळ भूसंपादन करण्यासाठी कडाडून याला विरोध दर्शवलेला आहे. विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्याच्या प्रक्रिया सध्या सुरू आहेत ,उदाची वाडी येथील शेतकऱ्याला आम्हीष दाखवले जाते की, तुम्हाला ड्रेस दोन घेतो, मुलीला मुलाला कामाला लावतो असे प्रकार अधिकारी भूसंपादन करून घेताना आश्वासने देत आहेत ,हा कसला प्रकार ?त्यामुळे ठाम निर्णयावर आम्ही शेतकरी आहोत की, विमानतळाला जमीन भूसंपादन करण्यासाठी मनीष हागवणे यांनी यासाठी कडाडून विरोध दाखवला आहे. निवासी झोन करता तर स्वतःचे क्षेत्र संमती देऊन खानवडी येथे शेजारील क्षेत्र सुद्धा घ्यावे ,त्यावर शिक्के मारण्यासाठी लावलेले हे महाशय सुद्धा काढण्यासाठी दुसऱ्याच्या बागायती क्षेत्रावरील अडचणी करत आहेत, स्वतःची देत असाल तर दुसऱ्याची बागायती जमीन देण्यासाठी तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे? त्यावर त्यांचे म्हणणे अजिबात ऐकून घेतले जात नाही ,आमच्या सातबारा वरील शिक्के काढावेत एवढीच फक्त मागणी त्या ठिकाणी खानवडी येथील शेतकरी यांची आहे, निवासी झोन करता फळे बागायती जमिनी आमच्या शेत्र आहे, भूसंपादनासाठी संमती देणे अजिबात आमची तयारी नाही, असे एडवोकेट स्वप्निल होले यांनी सांगितले. मात्र कुंभारवळण येथील शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा करीत जमीन न देण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे, प्रामुख्याने कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी, एखतपुर- मुंजवडी, पारगाव येथील शेतकऱ्यांची संमती न घेता अपुरी माहिती देऊन आणि चुकीच्या पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया राबवली जात आहे, त्यासाठी कायदेशीर पद्धतीने मार्गाने लढा देणार बाधित शेतकरी प्रतिनिधी आहेत,विमानतळ शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या भूसंपादन प्रक्रिया त्वरित थांबवली पाहिजे, ग्रामसभेची संमती घेतली पाहिजे ,पर्यायी जागा उपलब्ध असताना हा घाट कशासाठी? कुंभारवळण बागायती जमिनी 94% आहेत, त्या घेण्याचा हट्ट शासनाने सोडून दिला पाहिजे. शेतकऱ्यांनी वकिलांचा सल्ला घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, ती पूर्ण ताकतीने शेतकरी लढा देणार आहेत, त्यासाठी कुठलाही करार नामा करणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी सर्व शेतकऱ्यांनी मिळून केला आहे. यासाठी प्रमुख मार्गदर्शन ऍडव्होकेट राजेश टेकाळे, किशोर लासुरे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबई यांनी योग्य असे मार्गदर्शन विमानतळ भूसंपादन न करण्यासाठी बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी एक प्रकारे चांगले मार्गदर्शन केले .तर यावेळी कुंभारवळण या ठिकाणी रात्रीच्या वेळी 250 ते 300 शेतकरी महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते .याबरोबरच प्रशासकीय कुंभारवळण गावचे सरपंच मंजुषा गायकवाड यांच्यासह रामदास कामठे, सदाशिव कामठे, रोहित मोरे ,संदीप लोळे ,सोशल मीडियाचे पत्रकार, प्रिंट मीडियाचे पत्रकार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शेतकरी देविदास कामठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विकास खळदकर यांनी मानले.

Comments