Skip to main content
पुरंदर तालुक्यात सासवड या ठिकाणी शेतकरी प्रश्नावर काँग्रेसचे निषेध आंदोलन तर हमीभाव कर्ज माफी आणि खताच्या दर कपातीची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाढती महागाई शेतमालाला मिळत नसलेला योग्य असा भाव आणि शेतकऱ्याच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी दि. 18 रोजी सासवड येथील जयप्रकाश चौकातील जनसेवा बँके समोर शांततापूर्ण असे निषेध आंदोलन करण्यात आले, सकाळी 11 वाजता झालेल्या आंदोलनामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या धोरणा विरोधामध्ये तीव्र अशा नाराजी व्यक्त करण्यात आली या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, प्राध्यापक सचिन दुर्गाडे ,लहू अण्णा निवगुणे, युवक अध्यक्ष उमेश पवार, ऋषिकेशी जगताप, तालुका अध्यक्ष साहेबराव फडतरे, संदीप भोसले, बापू मोकाशी, राजेंद्र बरकडे, बाळासाहेब कड, शंकर दांगट, आप आदमी पार्टीचे राजन पवार आणि अतिश जगताप आदी उपस्थित होते. या आंदोलनाच्या दरम्यान कांदा व इतर शेतीमाल जाहीर हमीभाव देऊन शासनाने थेट खरेदी केली पाहिजे, राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करून, सातबारा कोरा करावा, तसेच खत औषधे नियमानाच्या वाढत्या किमती तातडीने कमी केल्या पाहिजेत, अशा प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या, नेत्यांनी भाष्य केंद्र व राज्य सरकारच्या कृषी धोरणावर टीका करताना शेतकरी दिवसोदिवस आर्थिक अडचणीत सापडत आहे ,उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात योग्य दर मिळत नाही, त्यामुळे महागाईमुळे शेतकरी आणि कामगार वर्गाची जीवन विस्कळीत होत चालले ,जी भावना त्यांनी व्यक्त केलीत या आंदोलनामधील तालुक्यातील शेतकरी कामगार विविध सामाजिक संघटना आणि पुरोगामी विचाराच्या संघटनांनी पाठिंबा दिला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment