Skip to main content
पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील सोलर प्रकल्पाचे काम बंद पडले ; तर गावकऱ्यांचा विरोध जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये बैठक संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राजेवाडी ता. पुरंदर येथील गायरान क्षेत्रांमध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत सोलर प्रकल्प राबविण्यात येत असून, हा प्रकल्प राबवताना ग्रामपंचायत स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर सुरू झाल्याने, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन सोलर प्रकल्पाला विरोध केला आहे, त्यानुसार हे काम बंद पाडलेले आहे, दरम्यान मंगळवारी दि. 12 रोजी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेण्यात आली, यावेळी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवण्यात आला, राजेवाडी येथील वीस एकर गायरान क्षेत्रातील जागेत हा सोलर प्रकल्प होऊ घातलेला असताना याला विरोध म्हणून ग्रामसभा घेतली, याबाबतचा पत्र व्यवहार सरपंच दत्तात्रय जगताप यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे मार्च महिन्यामध्ये केला होता, याबाबत आमदार विजय शिवतारे यांनीही जिल्हाधिकारी यांना प्रोजेक्ट करू नका, असे सांगितले होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हा प्रकल्प राबवणार असल्याचे सांगून, पोलीस बंदोबस्तामध्ये प्रोजेक्टचे काम सुरू केले होते, ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना लेखी माहिती न दिल्याने, नागरिक संतप्त झाले होते, त्यामुळे सोलर प्रोजेक्टचे काम बंद पाडले असून, याबाबतचे जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी ठेकेदार व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, शेतकऱ्या समवेत जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेतली, बैठकीत ग्रामपंचायत शेतकऱ्यांनी आमचा सोलर प्रोजेक्ट ला विरोध असल्याचे स्पष्टपणे बजावले होते, ग्रामसभेचा ठराव असल्याची त्यांनी ठणकावून सांगितले तरीही, ठेकेदार दादागिरीची भाषा करून ऐकण्यास तयार नव्हते, म्हणून ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांनी आमदार विजय शिवतारे यांना फोन करून वस्तुस्थिती सांगितली, त्यानुसार आमदार शिवतारे यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्याशी बोलून, ठेकेदार अधिकारी यांना खडसावून हा प्रकल्प बंद करा ,असे स्पष्ट आदेश दिले. याबाबत ग्रामपंचायत, शेतकरी व आमदार शिवतारे यांच्यात बैठक झाल्यानंतरच प्रकल्पाविषयी चर्चा केली जाईल ,असे सरपंच दत्तात्रय जगताप ,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, शेतकऱ्यांनी ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केले, याबाबत निवेदनही यावेळी ठेकेदार यांना दिले. यावेळी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष बाळासो जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र जगताप, महेंद्र जगताप, प्रवीण सणस, गणेश जगताप, महेंद्र जगताप, बाळासाहेब जगताप, मारुती जगताप, नंदू जगताप ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने आधी उपस्थित होते. गावकऱ्यांच्या माथी हा प्रकल्प मारू नका, भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, त्यामुळे तीन किलोमीटर ला राजेवाडी चा कायापालट होणार आहे ,राजेवाडी गावातील नागरिकांना सुविधासाठी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, क्रीडांगण, स्मशान भूमी, दपनभूमी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, कचऱ्याचे वर्गीकरण प्लॉट, सरकारी दवाखाने सर्व शासकीय कार्यालयासाठी जागाच उपलब्ध राहणार नाही, हा प्रकल्प 40 वर्ष अस्तित्वात राहणार असल्याने, भविष्यामध्ये गावासाठी जागा उपलब्ध होत नसल्यासने सुरुवातीलाच ग्रामस्थांनी ग्रामसभा ठरावानुसार विरोध दर्शवला तरी ,हा प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर मार्गाने प्रकल्प बंद पाडला जाईल असा स्पष्ट इशारा सरपंच दत्तात्रय जगताप, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे व शेतकऱ्यांनी दिलेला आहे.अशी माहिती सरपंच दत्तात्रय जगताप यांनी प्रतिनिधीला दिली आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment