पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील सोलर प्रकल्पाचे काम बंद पडले ; तर गावकऱ्यांचा विरोध जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये बैठक संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राजेवाडी ता. पुरंदर येथील गायरान क्षेत्रांमध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत सोलर प्रकल्प राबविण्यात येत असून, हा प्रकल्प राबवताना ग्रामपंचायत स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर सुरू झाल्याने, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन सोलर प्रकल्पाला विरोध केला आहे, त्यानुसार हे काम बंद पाडलेले आहे, दरम्यान मंगळवारी दि. 12 रोजी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेण्यात आली, यावेळी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवण्यात आला, राजेवाडी येथील वीस एकर गायरान क्षेत्रातील जागेत हा सोलर प्रकल्प होऊ घातलेला असताना याला विरोध म्हणून ग्रामसभा घेतली, याबाबतचा पत्र व्यवहार सरपंच दत्तात्रय जगताप यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे मार्च महिन्यामध्ये केला होता, याबाबत आमदार विजय शिवतारे यांनीही जिल्हाधिकारी यांना प्रोजेक्ट करू नका, असे सांगितले होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हा प्रकल्प राबवणार असल्याचे सांगून, पोलीस बंदोबस्तामध्ये प्रोजेक्टचे काम सुरू केले होते, ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना लेखी माहिती न दिल्याने, नागरिक संतप्त झाले होते, त्यामुळे सोलर प्रोजेक्टचे काम बंद पाडले असून, याबाबतचे जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी ठेकेदार व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, शेतकऱ्या समवेत जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेतली, बैठकीत ग्रामपंचायत शेतकऱ्यांनी आमचा सोलर प्रोजेक्ट ला विरोध असल्याचे स्पष्टपणे बजावले होते, ग्रामसभेचा ठराव असल्याची त्यांनी ठणकावून सांगितले तरीही, ठेकेदार दादागिरीची भाषा करून ऐकण्यास तयार नव्हते, म्हणून ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांनी आमदार विजय शिवतारे यांना फोन करून वस्तुस्थिती सांगितली, त्यानुसार आमदार शिवतारे यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्याशी बोलून, ठेकेदार अधिकारी यांना खडसावून हा प्रकल्प बंद करा ,असे स्पष्ट आदेश दिले. याबाबत ग्रामपंचायत, शेतकरी व आमदार शिवतारे यांच्यात बैठक झाल्यानंतरच प्रकल्पाविषयी चर्चा केली जाईल ,असे सरपंच दत्तात्रय जगताप ,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, शेतकऱ्यांनी ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केले, याबाबत निवेदनही यावेळी ठेकेदार यांना दिले. यावेळी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष बाळासो जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र जगताप, महेंद्र जगताप, प्रवीण सणस, गणेश जगताप, महेंद्र जगताप, बाळासाहेब जगताप, मारुती जगताप, नंदू जगताप ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने आधी उपस्थित होते. गावकऱ्यांच्या माथी हा प्रकल्प मारू नका, भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, त्यामुळे तीन किलोमीटर ला राजेवाडी चा कायापालट होणार आहे ,राजेवाडी गावातील नागरिकांना सुविधासाठी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, क्रीडांगण, स्मशान भूमी, दपनभूमी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, कचऱ्याचे वर्गीकरण प्लॉट, सरकारी दवाखाने सर्व शासकीय कार्यालयासाठी जागाच उपलब्ध राहणार नाही, हा प्रकल्प 40 वर्ष अस्तित्वात राहणार असल्याने, भविष्यामध्ये गावासाठी जागा उपलब्ध होत नसल्यासने सुरुवातीलाच ग्रामस्थांनी ग्रामसभा ठरावानुसार विरोध दर्शवला तरी ,हा प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर मार्गाने प्रकल्प बंद पाडला जाईल असा स्पष्ट इशारा सरपंच दत्तात्रय जगताप, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे व शेतकऱ्यांनी दिलेला आहे.अशी माहिती सरपंच दत्तात्रय जगताप यांनी प्रतिनिधीला दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.