Skip to main content
पुरंदर तालुक्यात भरारी पथके तैनात करावीत ; बियाणे खताची चढ्या दराने विक्री रोखण्याची प्रयत्न करावेत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते ही उपलब्ध व्हावीत यासाठी बोगस बियाणे विक्रेत्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी, पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी प्रशासनाने व्यापक अशी जनजागृती करणे गरजेचे असून, असे निर्देश आमदार विजय शिवतारे यांनी दिले. बोगस बियाणे आणि खताची चढ्या दराने होणारी विक्री रोखण्यासाठी तालुक्यामध्ये भरारी पथके तैनात करण्यात यावी, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनाही बॅग आणि टॅग जपून ठेवावा, असे आव्हान तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी केले. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची निर्देशही देण्यात आले सासवड ता. पुरंदर येथे आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगामी नियोजन सभेत ते बोलत होते. पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मंगळवारी दि. 12 रोजी आढावा सभा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पार पडली. यावेळी शिवतारे यांनी शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्ध करून, देण्याच्या सूचना दिल्या यंदा तालुक्यात साठी 1400 क्विंटल भात, 1600 क्विंटल सोयाबीन, 315 क्विंटल बाजरी आणि 272 भुईमूग, बियाणे तर 13402 टन खताची नियोजन करण्यात आले आहे, प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये ,या बैठकीस पंचायत समिती सभापती अमित झेंडे, उपसभापती प्रवीण जगताप, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ , नायब तहसीलदार संदीप पाटील ,प्राजक्ता दुर्गाडे, हरिभाऊ लोळे, पंचायत समिती सदस्य, सदस्या, कृषी अधिकारी, पिक विमा प्रतिनिधी, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व शेतकरी आदी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment