“ज्ञान, संवेदनशीलता व अंमलबजावणी महत्त्वाची” — डॉ. मनोहर चासकर सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे इंग्रजी, वाणिज्य आणि रसायनशास्त्र या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. शैक्षणिक, संशोधनात्मक आणि बौद्धिक देवाणघेवाणीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या परिषदांचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले.उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. मनोहर चासकर यांनी जागतिक स्तरावर संशोधनाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात संशोधन ही केवळ शैक्षणिक आवश्यकता नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषी विचार, कौशल्याधारित शिक्षण आणि संशोधनवृत्ती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी अध्यापकांनी मार्गदर्शक, प्रेरक आणि संशोधन सुलभ करणारे घटक म्हणून कार्य केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सेल्फ-फंडेड चर्चासत्रामागील संकल्पना स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अशा परिषदेमुळे महाविद्यालयीन पातळीवर शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागते तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय आणि संवाद अधिक दृढ होतो. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन आणि सर्जनशीलतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.इंग्रजी विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. संजय झगडे यांनी परिषद आयोजनाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना, “Literature, Culture and Society: Emerging Trends in English Studies”, “Innovation and Sustainability in Commerce and Management in the Digital Era” आणि “Frontiers in Sustainable and Advanced Chemical Sciences” या विषयांमधील संशोधनाच्या नव्या दिशा अधोरेखित केल्या. त्यांनी सांगितले की, अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे विविध क्षेत्रांतील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी एकाच व्यासपीठावर येतात, ज्यामुळे ज्ञानवृद्धीबरोबरच नवीन संकल्पनांचा विकास होतो.या प्रसंगी मराठी विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र “एकविसाव्या शतकातील साहित्य अभिव्यक्ती: अभ्यास आणि संशोधन” या विषयावरील प्रोसिडिंगचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशनामुळे संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत उपलब्ध झाला आहे.या आंतरराष्ट्रीय परिषदेस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 400 पेक्षा अधिक प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. विविध तांत्रिक सत्रांमध्ये संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले, ज्यातून नव्या कल्पना, दृष्टिकोन आणि संशोधनाच्या संधी उलगडून आल्या.एकूणच, या परिषदेमुळे शैक्षणिक क्षेत्रात नवे क्षितिज उघडले गेले असून, संशोधन, नवोन्मेष आणि ज्ञानवृद्धीला चालना मिळाल्याचे समाधान सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आले. या परिषदेचे आयोजन वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे समन्वयक डॉ. विजय पुणेकर, डॉ. किशोर लिपारे, डॉ. नरेंद्र कांबळे यांनी केले होते. या प्रसंगी IQAC चे समन्वयक डॉ. बजरंग शिंदे, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, उपप्राचार्य डॉ. बी. यु. माने, वाणिज्य विभाग समन्वयक डॉ. नरसिंग गिरी, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शितल कलापुरे, डॉ. मदभावीकर आणि डॉ. विशाखा गणवीर यांनी प्रभावीपणे केले.. शेवटी डॉ. नरसिंग गिरी यांनी सर्व मान्यवर, सहभागी आणि आयोजन समितीचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.फोटो कॅप्शन उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. मनोहर चासकर व उपस्थित मान्यवर

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.