Skip to main content
मुंबई उच्च न्यायालयाने विमानतळ प्राधिकरणाला खडे बोल सुनावले; तर मुंबई उच्च न्यायालयाकडून पुरंदर विमानतळ जागा बदलाचे स्पष्ट संकेत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: विमानतळाच्या जाग्या बदलाच्या तांत्रिक मुद्द्यावर सात गावातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून, त्याची काल 23 एप्रिल रोजी सुनावणी पार पडली, सुनावणी दरम्यान दोन वेळा जागा बदलली मात्र योग्य जागा कुठलीही याबद्दल सरकारी खात्याकडे कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे, न्यायालयाचे निरीक्षण या प्रकल्पात भूसंपादन महत्त्वाचे नसून, विमानतळाची जागा योग्य की? अयोग्य? हे महत्त्वाचे आहे, परंतु स्थगिती आदेश देण्यासाठी एमआयडीसीला प्रतिवादी करावी लागणार आहे, कारण भूसंपादनाचे अधिकार त्यांच्याकडे आहेत, विमानतळ प्रकल्पाशी संबंधित असलेल्या सर्व सरकारी खात्यांचे वकील जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याची सुनावणी दरम्यान दिसून आले आहे. विमानतळ उभारणीसाठी काही पैसे खर्च करतात, आणि नंतर म्हणतात की, या ठिकाणी विमान उडू शकत नाही, त्यापेक्षा आम्ही या प्रकल्पाला स्थगिती का? देऊ नये, मुंबई उच्च न्यायालय. दोन महिन्यापासून उच्च न्यायालय शासनाला योग्य जागा कुठली? हे सिद्ध करा असा प्रश्न विचारत असून, कोणाकडेही याचे उत्तर नसल्याकारणाने, न्यायालयाने यंत्रणांना खडे बोल सुनावले आहेत, एकंदरीत कालच्या सुनावणीचा कल पाहता पुढील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाकडून पुरंदर विमानतळाला कायदेशीर स्थगिती येऊ शकते असे स्पष्ट दिसत आहे, यामुळेच दहा मार्चपासून भूसंपादन मोबदला वाटप चालू करणार आहोत, असे सांगणारे जिल्हा प्रशासन आता 24 एप्रिल आले तरी शांत असल्याचे दिसून येत आहे? स्पष्ट का होत नाही यांचे उत्तर अधिकारी याकडून नाही.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment