Skip to main content
एम.ई.एस. आबासाहेब गरवारे महाविद्यालय (स्वायत्त) तथा भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय शिक्षण मंडळ स्थापना दिनानिमित्त “विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 2025” या विषयावर प्रभावी व विचारप्रवर्तक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साह, शिस्त आणि नियोजनपूर्वक पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रो. (डॉ.) आर. एम. चिटणीस उपस्थित होते. त्यांनी “विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक 2025” या विषयाचे विविध पैलू अत्यंत सुसंगत व व्यापक पद्धतीने मांडले. कोणतेही विधेयक राजपत्राच्या स्वरूपात लागू होण्याच्या प्रक्रियेत असताना केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक नागरिकाने त्या विधेयकाचा अभ्यास करून त्यावर रचनात्मक व सकारात्मक सूचना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रो. चिटणीस यांनी आपल्या भाषणात भारतीयत्व जपत जागतिक स्तरावर भारताची स्वतंत्र व प्रभावी ओळख निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. बदलत्या आंतरराष्ट्रीय संदर्भात भारताला सक्षम, आत्मनिर्भर आणि मूल्याधिष्ठित शिक्षणव्यवस्थेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची विधेयके त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षक हा सर्वात मोठा परिवर्तनकारी घटक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्यामार्फत स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम काळाची गरज असल्याचे सांगितले. भारतीय शिक्षण मंडळामार्फत अशा प्रकारचे चिंतनपर व राष्ट्रहिताचे कार्यक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमात भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत मंत्री डॉ. गणेश चव्हाण हेही प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विलास उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुव्यवस्थित पद्धतीने करण्यात आले. महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, भारतीय शिक्षण मंडळाचे सदस्य तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित सुमारे 135 हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते.प्राचार्य प्रा. विलास उगले यांनी विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयकाचे विविध पैलू स्पष्ट करत त्याची आवश्यकता व महत्त्व अधोरेखित केले. उपप्राचार्य प्रा. अनिल खैरनार यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. त्यांनी भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याचा, उद्दिष्टांचा आणि राष्ट्रनिर्माणातील भूमिकेचा संक्षिप्त आढावा सादर केला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सहभागींसोबत प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून शिक्षणाच्या विविध आयामांवर चर्चा झाली. प्रो. चिटणीस यांनी सर्व प्रश्नांना अत्यंत सुस्पष्ट व संतुलित उत्तरे देत उपस्थितांचे मार्गदर्शन केले. भारतीय शिक्षण मंडळ स्थापना दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी, विचारसमृद्ध आणि यशस्वी ठरला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment