Skip to main content
पुरंदर मधील भारनियमन बंद करण्यासाठी स्पष्ट इशारा ;तर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य महावितरण विरोधामध्ये बेमुदत उपोषण पुरंदरच्या पूर्व भागात रात्री चार तास भार नियमन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: काही पोल्ट्री उद्योग तसेच फुल शेती करणारे शेतकरी विज चोरी करत असताना, त्यांच्यावर कडक अशी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून महावितरणला निवेदनाच्या स्वरूपात देण्यात आली, पुरंदरच्या ग्रामीण भागातील घरगुती भार नियमन 15 दिवसात बंद न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर हे बे मुदत उपोषण करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य माऊली यादव व जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे यांनी दिलेला आहे, याबाबतची निवेदन कार्यकारी अभियंता भालचंद्र गवई यांना देण्यात आले आहे, भारनियमानामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे, शिवाय सध्या कडक उन्हाळा असल्याने, सर्वांना भारनियमानामुळे त्रास होत असून, परिसरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे, या त्रासातून सुटका होण्यासाठी त्वरित भार नियमन रद्द करावी अशी मागणी निवेदनामध्ये केलेली आहे, परिसरातील काही पोल्ट्री उद्योग तसेच फुलशेती करणारे शेतकरी विज चोरी करत असून, त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे, व्यावसायिकांची व स्थानिक वायरमेनचे आर्थिक हितसंबंध असल्याची, तक्रार देखील यावेळी करण्यात आली असून, अंकुश (बापू )भगत, रोहिदास कड, संदीप देवकर, महेश राणे, बळीराम सोनवणे यासह ग्रामस्थ, शेतकरी आधी उपस्थित होते. अनाधिकृत वीज जोडवर कारवाई करणार ,परिसरामधील चोरीचे प्रमाण वाढले आहे, पोल्ट्री उद्योग फुल शेती करणारे शेतकरी यांच्या अनाधिकृत वीज जोडवर देखील तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गवळी यांनी दिलेले आहेत, कारवाई करण्याचा इशारा याबाबत कार्यकारी अभियंता यांनी सिंगल फेज विद्युत पुरवठा करत असताना, काहीजण थ्री फेज उपकरणे वापरत आहेत, परिणामी लोड मर्यादा येऊन, पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळे अशा विविध चोरावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, उपकार्यकारी अभियंता गणेश चांदणे, सहाय्यक अभियंता जीवन ठोंबरे आधी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment