Skip to main content
पुरंदर तालुक्यातील जेजुरी बेलसर परिसरातील झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू अपगातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भेट देऊन मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत ; तर जखमीवर मोफत उपचार करण्याचे निर्देश सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान आज सकाळी सासवड जेजुरी मार्गावरील जेजुरी बेलसर परिसरामध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला असून तर काही महिलासहित वारकरी जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन ,जखमी वारकऱ्यांची विचारपूस करण्यात आली त्यावेळी त्यांनी उपचाराधीन वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याकडून घेतली तसे जखमींना उपचार ते वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून, जखमी वारकऱ्यावर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील तसेच आवश्यकतेनुसार आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी जेजुरी नगर पालिकेचे नगराध्यक्ष जयदीप दिलीप बारबाई ,उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे ,तहसीलदार विक्रम राजपूत ,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ गुरु शांतिनाथ श्री भावार्थ देखणे, सभापती पुरंदर पंचायत समिती अमित झेडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आधी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या की, जखमी वारकऱ्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत ,शासन अपघातग्रस्त वारकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे ,आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा नियमित आढावा घेऊन, वारी मार्गावरील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या, पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, वाहन चाल कांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवून, वारकऱ्यांच्या सुरक्षेतेची विशेष काळजी घ्यावी असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment