Skip to main content
खरीप हंगामावर 'एल निनो'चे सावट; कृषी विभागाकडून 'संतुलित खत वापर व एल निनो जागृती मोहीम सुरु सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आगामी खरीप हंगामावर 'एल निनो' (El Niño) चे मोठे संकट असून, यंदा सरासरीपेक्षा कमी व खंडित पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि पीक उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांचे संयुक्त विद्यमाने "संतुलित खतांचा वापर व एल-निनो जनजागृती मोहीम" युद्धपातळीवर राबवली जात आहे . सदर कार्यक्रम मौजे सिंगापूर (विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ग्रामपंचायत शेजारी) येथे मा. तालुका कृषि अधिकारी, पुरंदर श्री. श्रीधर चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक-०५/०६/२०२६ रोजी पार पडला. *सदर कार्यक्रमास मार्गदर्शन करनेसाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथील शास्त्रज्ञ श्री.संतोष करंजे यांनी संतुलित खतांचा वापर करताना प्रथम माती परीक्षण करूनच शिफारशीनुसार योग्य प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM): रासायनिक खतांसोबत शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि जैविक खतांचा (Biofertilizers) वापर वाढवा, ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहील व El Nino च्या दृष्टीने करावयाच्या उपाय योजनामध्ये पीक नियोजन, कमी पाण्याच्या वाणांची निवड: भात किंवा ऊस यांसारखी जास्त पाणी लागणारी पिके टाळून कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन, मूग, उडीद, तूर, बाजरी आणि कापूस या पिकांना प्राधान्य द्यावे. आंतरपीक पद्धती (Intercropping) एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र किंवा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून एक पीक धोक्यात आले तरी दुसरे पीक आधार देईल. पेरणीची घाई न करता किमान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय खरीपाची पेरणी करू नये असे अहवान करण्यात आले. सुनिल नाळे अंजीर सिताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी यांनी सिताफळ व अंजीर लागवड व बहार व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले श्रीम.दिपाली कदम सहायक कृषी अधिकारी यांनी शासकीय विभागाच्या योजनेची सविस्तर माहिती दिली, सचिन जगताप उप कृषी अधिकारी, पिसर्वे १ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सदर प्रशिक्षण कार्यक्रमास मयुर कचरे, मंडळ कृषि अधिकारी, पिसर्वे, श्रीम.स्मिता वर्पे, बीटीएम पुरंदर, श्रीम.अर्चना लवांडे सरपंच, विक्रांत पवार उपसरपंच, दशरथ लवांडे माजी सरपंच,रामभाऊ उरसळ माजी सरपंच रामचंद्र खेडेकर सीताफळ महासंघाचे उपाध्यक्ष , वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी समिल इंगळे, महिला व पुरुष शेतकरी बचत गटातील शेतकरी, कृषी व पशु सखी,शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य प्रशिक्षणास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment