पुरंदर विमानतळ बाधितांच्या जमिनीचे संमती वाटप तहसीलदार कार्यालयात सुरू; कुंभारकर कुटुंबीयांच्या खात्यात १ कोटी ८ लाख जमापहिल्या टप्प्यात उदचीवाडी येथील ३३ गुंठे जमिनीचा व्यवहार पूर्ण; १० जूनपर्यंत संमती करार करण्याचे प्रशासनाचे आवाहन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याची प्रक्रिया आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरली आहे. तहसीलदार कार्यालय पुरंदर (सासवड) येथे आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पहिल्या शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला देऊन या प्रक्रियेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे आणि उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रशासकीय टप्पा पार पडला.पुरंदर विमानतळासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आज ७ मे रोजी तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदचीवाडी येथील शेतकरी विलास कैलास कुंभारकर व कैलास पांडुरंग कुंभारकर यांच्या ३३ गुंठे जमिनीचा संमती करारनामा प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून नोंदवण्यात आला. या जमिनीच्या मोबदल्यापोटी १ कोटी ८ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम तातडीने आरटीजीएस द्वारे कुंभारकर यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने जाहीर केलेले दर हे बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत समाधानकारक आहेत. १० जून २०२६ पर्यंत सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपले संमती करार पूर्ण करावेत, जेणेकरून त्यांना सक्तीच्या भूसंपादनाऐवजी संमतीने मिळणारे जास्तीत जास्त लाभ घेता येतील.एमआयडीसी कायद्यांतर्गत होणाऱ्या या भूसंपादनात शेतकऱ्यांना केवळ रोख रक्कमच मिळणार नाही, तर इतरही अनेक मोठे फायदे देण्यात येत आहेत. यामध्ये १०% विकसित भूखंडाचा ताबा, कुटुंबातील सदस्याला नोकरीत प्राधान्य आणि पुनर्वसनासाठी साडेसात लाखांपर्यंतचे विशेष अनुदान यांचा समावेश आहे. १० जूननंतर संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत 'सक्तीचे भूसंपादन' केले जाईल, ज्यात काही सवलतींना मुकावे लागू शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. बँक खात्यांशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रतिनिधींचीही मदत घेतली जात आहे. कुंभारकर कुटुंबीयांप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन विकास प्रकल्पात सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे.••प्रतिक्रिया••"उच्चाधिकार समितीने मंजूर केलेले दर हे अंतिम असून ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. आम्ही पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवत आहोत. ज्या शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे, त्यांना तातडीने मोबदला दिला जात आहे. १० जूनपूर्वी संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सवलती मिळतील, त्यामुळे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा."— कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय).फोटो ओळ: पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रिया: तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे उदचीवाडीतील शेतकरी विलास कुंभारकर व कैलास कुंभारकर यांचा संमती करारनामा पूर्ण करताना उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.