Skip to main content
पुरंदर तालुक्यातील राजुरी ते पिसर्वे पुलावरील खड्डे बुजवल्यामुळे सामान्य शेतकरी व प्रवासी आनंदीत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील पूर्व भागामध्ये राजुरी ते पिसर्वे रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले असले, तरी मुख्य रस्त्यावरील पुलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्याचा गॅप निर्माण झाल्या कारणाने, आत्तापर्यंत वाहन चालकासाठी गंभीर अशा प्रमाणामध्ये धोका निर्माण झालेला होता, या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात घडलेले होते, पुलावरून जाताना वाहनांना अचानक धक्का बसत असल्याकारणाने, अनेक वाहन चालकांचे संतुलन बिघडत होते, अपघात घडत होते, तसेच या ठिकाणी कोणतीही सूचनाफलक किंवा इशारे नसल्याचे अपघाताचा धोका व अधिक वाढलेला होता अनेक वाहन चालकांना किरकोळ दुखापती ही झालेल्या होत्या, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उद्योगपती संतोष हरिभाऊ मुळीक यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे, यावेळी रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवणारे रमेश साबळे सुपरवायझर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, पुलाववरील खड्डे तातडीने बुजवण्यासाठी मागणी करण्यात आली होती, या भेटीमध्ये पिसे गावचे सामाजिक कार्यकर्ते रामदास( बापू )मुळीक, संदीप गणपत मुळीक, नवनाथ बापूराव मुळीक, रमेश पांडुरंग मुळीक आदी उपस्थित होते. मागणीची दखल घेत साबळे यांनी दुसऱ्याच दिवशी पुलावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून गॅप ठेवण्याचे काम करण्यात आले, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा असा दिलासा मिळाला असून, वाहन चालकांनी एक प्रकारे समाधान व्यक्त केले आहे. पुलावरील खड्ड्याचा गॅप बुजवल्या या कारणामुळे प्रवाशांचा त्रास कमी झालेला आहे, सामान्य शेतकऱ्यांचा शेतातील माल नेण्यासाठी सासवड या ठिकाणी त्यांना सोयीस्कर झालेले आहे, शाळा पुढच्या महिन्यामध्ये चालू होताना, प्रवासी यांचे ,व्यापारी वर्गांचे सामान्य शेतकरी यांचे सोईस्कर पद्धतीने मार्ग चालू झालेला आहे. यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला असून, मात्र अजूनही या ठिकाणी अधिक दर्जेदार आणि कायमस्वरूपी काम करणे गरजेचे आहे. संतोष हरिभाऊ मुळीक उद्योगपती.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment