Skip to main content
पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे, सोमरडी मधील घटना लग्नाच्या पंगती मधून 62 जणांना विषबाधा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे व सोमर्डी परिसरामध्ये रविवारी दि. 3 रोजी लग्न समारंभा मधील जेवणातून 62 जणांना अधिक त्यापासून नागरिकांना अन्नातून विषबाधा झाली असून, बाधिता मध्ये 28 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोग्य प्रशासनाने गावात तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे, मिळालेल्या माहितीनुसार लग्नातील रबडी, भाजी, गुलाबजाम आणि बटाटवडा खाल्ल्यानंतर नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला होता, रुग्णसंख्या वाढताच बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गराडे उपकेंद्रातील पथकांनी घटनास्थळी धाव घेतली, गंभीर रुग्णांना सासवड येथील खाजगी रुग्णालयात हालवण्यात आले असून, 12 जणांना सलाईन द्वारे उपचार सुरू आहेत, उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असून, काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांनी रुग्णालयात व सोमरडी गावात जाऊन रुग्णांची माहिती घेतली त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी विक्रम काळे व जिल्हा परिषद सदस्या रूपाली अमोल झेंडे या उपस्थित होत्या .आरोग्य विभागाने गावात घरोघरी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून, किरकोळ लक्षणे असलेल्या नागरिकांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत, अशी परिस्थिती नियंत्रणात आहे .डॉ. विक्रम काळे आरोग्य अधिकारी पुरंदर तालुका. या घटनेमुळे लग्न समारंभातील अन्नाच्या गुणवत्तेवर गंभीर असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अन्नभेसळ प्रतिबंधक विभागात सोबत मंगळवारी दि. 5 रोजी तातडीची बैठक घेऊन, यापुढे लग्नसमारंभातील अन्नाची तपासणी करणे, बाबतचे निर्णय घेतले जातील. अमित झेडे सभापती, पुरंदर पंचायत समिती.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment