Skip to main content
पुरंदर तालुक्यातील निळूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक संदीप कदम कामात हलगर्जीपणामुळे शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: निळूज ता. पुरंदर येथील समाजामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जडणघडणीमध्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, परंतु त्या ठिकाणी शिक्षकाकडून आदर्श वर्तुणुकीचे अपेक्षेचा भंग केला जात आहे. आणि कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कठोर अशी कारवाई करत निलंबनाचा एक प्रकारे दणका दिलेला आहे. पुरंदर तालुक्यातील निलुज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक संदीप शशिकांत कदम यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांना मुळशी पंचायत समिती येथे या ठिकाणी हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, संबंधित शिक्षकाविरोधामध्ये पुरंदर पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेकडे सातत्याने तक्रारी या प्राप्त होत होत्या, याच तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने तपासणी पथकाची नियुक्ती केली होती, 30 एप्रिल 2026 रोजी पथकाने मिळून येथील शाळेचे अचानक अशी तपासणी केली असता, संबंधित शिक्षक शाळेत अनुपस्थित होते काही वेळेनंतर ते शाळेत पोहोचले, असता शालेय कामकाजामध्ये अनियमितपणा आढळून आला शिक्षण विभागाच्या महत्त्वकांक्षी निपुण पुणे आणि निपुण महाराष्ट्र उपक्रमाविषयी संबंधित शिक्षकांनी पुरेशी माहिती नसल्याचेही तपासणी पथकामध्ये निदर्शनास आले, उपस्थितीच्या नोंदणी मध्ये अनियमितपणा आढळला शाळेतील विद्यार्थी संख्या केवळ पाच असतानाही उपस्थिती नोंदणी मध्ये अनियमितपणा आढळून आला असून, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असलेली चाचणी परीक्षेचे रेकॉर्ड सुद्धा उपलब्ध नव्हते, शाळेची पट कमी होत असतानाही तो वाढविण्यासाठी कोणतेही प्रभावी असे प्रयत्न करण्यात आले नसल्याचे, या पथकाने नमूद केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळ वाया गेल्याची सुद्धा नमूद केले आहे. तपासणी अहवालानुसार संबंधित शिक्षक सामाजिक माध्यमावर अधिक सक्रिय असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचे ,निरीक्षकांनी नोंदवण्यात आलेले आहेत .तपासामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळ वाया गेल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे, याच कारणामुळे नियमांचा भंग केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान आढळलेल्या गंभीर बाबींचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आलेला असून, त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियमाचा भंग केल्याच्या कारणावरून संदीप कदम यांच्यावर 30 एप्रिल 2026 रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत त्यांना मुळशी पंचायत समितीमध्ये हजर राहण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment