पुरंदर तालुक्यातील सासवड येथे महाराज स्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ; तर 1200 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला शिबिरांमध्ये लाभ सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजासव अभियान अंतर्गत सासवड मंडल भागातील आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा महाराजसव समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सासवडमधील आचार्य अत्रे सभागृहामध्ये पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सासवड नगरीच्या वतीने या शिबिराचे आयोजन नगराध्यक्षा आनंदी (काकी) जगताप यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते, जगताप यांनी या उपक्रमासाठी विशेष असा पाठपुरावा करत विविध विभागांना एकत्र आणत, नागरिकांच्या विविध समस्या एका छताखाली जलद गतीने सोडविणे शक्य झाले ,अशा भावना उपस्थितितांनी व्यक्त केल्या, सर्वसामान्य जनता शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे शासकीय अडथळे दूर करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत शिबिराचे सुयोग्य असे नियोजन करण्यात आले होते, सासवड, आंबोडी, दिवे, पवारवाडी, काळेवाडी, झेंडेवाडी, सोनोरी, कुंभारवळण, हिवरे, पिंपळे आदी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, पाणंद रस्त्यांना प्राधान्य द्यावे, शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना आखलेल्या आहेत ,प्रशासनांनी पुरंदर तालुक्यातील पाणंद रस्त्यांचे काम विना तक्रार मार्गे लावून शेतकऱ्यांची जीवन सुखकर करण्यासाठी प्राधान्य द्यावे ,असे आवाहन पुणे विभागाचे उपायुक्त रोहयो विभागीय आयुक्त संजीव पलांडे यांनी केले. नामदेव टिळेकर रजा राखीव उपजिल्हाधिकारी पुणे यांनी सुद्धा शासकीय योजना या सर्व सामान्य नागरिकांना त्याचा लाभ व्हावा यावर असे त्यांनी आवाहन करण्यात आले ,या शिबिरात महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण ,अर्थसाह्य, वन विभाग आधी विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते. उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र ,निवासी दाखले, सात बारा उतारे ,फेरफार ,वारस नोंद, ई मोजणी ,तुकडे बंदी नियमतीकरण, पीएम किसान नमो किसान, संजय गांधी निराधार, दिव्यांग योजना तसेच ग्रामपंचायत कर संबंधित प्रश्नावर मोठ्या अर्ज सादर करण्यात आले ,अनेक प्रकरणाचा जागेचा निपटारा हा करण्यात आला, शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने सत्र न्याय विशेष अशी पथके नियुक्त केली होती, संजीव पलांडे उपायुक्त रोहयो विभागीय आयुक्त, नामदेव टिळेकर रजा राखीव उपजिल्हाधिकारी, विक्रम राजपूत तहसीलदार, डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद ,आनंदी (काकी )जगताप नगराध्यक्ष सासवड नगरपरिषद ,मनोहर (तात्या) जगताप उपनगराध्यक्ष ,श्रीधर चव्हाण कृषी अधिकारी पुरंदर, स्मिता गौड भूमी अभिलेख, संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार ,नगरसेवक /नगरसेविका सासवड नगरपरिषद इत्यादी मान्यवर या सह महसूल विभागातील सुहास कांबळे सासवडचे मंडलअधिकारी, हरिश्चंद्र फरांदे तलाठी सासवड तसेच महसूल विभागातील तलाठी व मंडलाधिकारी, परिसरातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, आजी माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात आज 1290 प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे असे विक्रम राजपूत तहसीलदार यांनी नमूद केले. सूत्रसंचालन सागर जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.