महाराष्ट्रातील क्रांतिकारांची बारडोली. - सासवडपुरंदर च्या मातीतील क्रांतिकारी इतिहास आता चित्रपट आणि पुस्तक रूपात झळकणार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आपल्या भारत देशावर १५० वर्ष राज्य करणाऱ्या जुलमी ब्रिटिश सरकारला 'सळो की पळो' करण्याचे काम देशातील अनेक क्रांतीकारकांनी आपल्या शौर्याने आणि बलिदानाने केले. १९४२ ची “ चलेजाव” चळवळ भारतातील प्रत्येक "खेडोपाडी" गांधीं चळवळ म्हणून राज्यातील घराघरातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली. स्वातंत्र्याची धगधगती ज्वाला भडका घेऊन इंग्रजांना भारत सोडण्यास मजबूर झाली. या स्वातंत्र्य चळवळीसाठी अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड - पुरंदरच्या मातीतील क्रांतीकारी आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे.इतिहास वाचला पाहिजे, जपला पाहिजे , त्यातील सकारात्मक गोष्टींचा अर्क पुढच्या पिढीला सुपुर्त केला पाहिजे तरच नविन तरुण पिढी चांगली घडेल आणि भारत देशाच्या सामाजिक , ऐतिहासिक , सांस्कृतिक, एकात्मतेचा वारसा भविष्यात टिकेल . ही मनात भावना ठेवून सासवड चे सुपुत्र चित्रपट कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी एक पाऊल पुढे उचलले आहे.त्यांनी हा संपूर्ण धगधगता इतिहास चित्रपट आणि पुस्तक रूपात जगापुढे आणण्याचे ठरवले आहे.याच संदर्भात कर्हानदीकाठावरील सरदार पुरंदरे यांच्या राम बागेतील श्री राम मंदिरात नुकतीच स्वातंत्र्य सैनिक यांचे वंशज आणि सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या देशाविषयी कृतज्ञता असणाऱ्या मंडळींची सभा जोरदार रंगली.सामाजिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ लोकनेते माननीय रावसाहेब आण्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ विधितज्ञ आण्णासाहेब खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिने अभिनेते, लेखक - दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम यांच्या कलात्मक नजरतेतुन स्वतंत्र्य पुर्व काळातील सासवड - पुरंदरच्या या बारडोली मध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.सासवड - पुरंदर परीसरातील स्वातंत्र्य चळवळीची मशाल रणरागिणी प्रेमाताई कंठक , पुज्य , शंकरराव देव, आचार्य भागवत , यांच्या प्रेरणेने सासवड ला अनेक स्वातंत्र्य सैनिक दिले . त्यापैकी भिकु तात्या जगताप , आनंदमामा जगताप, निवृत्ती इनामके, चंदनलाल मुथा, तानुबाई मोजे, बबन मोजे, माणिकचंद मुथा, शांताबाई कोटेचा, ताराबाई मुथा , भाऊसाहेब तारकुंडे,अंबर मदनलाल मुथा ,दिगंबर चौधरी, लालचंद मुथा,अब्दुल आत्तार, यशवंत भोंगळे जयवंत भोंगळे ,माधवराव मेमाणे, गणेश गोळे,गुंडोपंत दिडभाई , वामनपुरी गोसावी, विठ्ठल टकले, वरून महागावकर, गहिनाजी म्हेत्रे, शंकर जगताप,गणपतराव इंदलकर, गणपतराव निरगुडे, वसंतराव निरगुडे, रघुनाथ पवार, नानासाहेब पवार, गणपतराव ताकवले,गुलाबराव ताकवले,महादेव होले,रघुनाथराव काकडे, सर्जेराव ताकवले, गोविंदराव भोसले,भगवानराव कुलकर्णी, भुजबळ सिद्धूभाऊ,बोकील रंगराव, नीलकंठ देशमुख,गोविंद जाधव, गणपत बोथरे, गोविंद कवीतकर,विष्णू जाधव,नारायण देसाई याच्यासह अनेक क्रांतिकारी महिला पुरुषांनी संपूर्ण जीवनभर योगदान दिलेचार तास चाललेल्या या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिक यांचे वंशज, तुकाराम इनामके, धनंजय जगताप,परशुराम देशमुख,माजी सैनिक किरण पुरंदरे,विनोद इनामके,अमोल इनामके,शाम महाजन, मयूर इंदलकर, मोहन बागडे,संतोष काकडे,राजेंद्र भोंगळे,अरुण भोंगळे,विलास ताम्हाणे,निलेश शिंदे,संजय काटकर,देवा भालेराव,दिलीप पायगुडे,अय्युब आतार,अब्रार आतार, हारून आतार, दिलीप निरगुडे,बापू म्हेत्रे, मोहिनोद्दीन आतार, हनुमंत जगताप,संतोष आबा काकडे,धनंजय जगताप, परशुराम देशमुख , आदींनी दस्तावेज, ताम्रपत्र, त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांनी लिहून ठेवलेल्या रोजनिशी, पुरातन फोटो, पुस्तक संदर्भ, ऐकीव माहिती आधीच्या साथीने आठवणींना उजाळा दिला. आलेल्या सर्वांचे गांधीजीची आत्मकथा हे पुस्तक आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संदीप इनामके स्टुडिओ च्या संचालीका सौ.नवनी संदीप इनामके क्रिएटिव्ह दिग्दर्शक निनाद देशपांडे, संकलक करण घुले,सहाय्यक छायाचित्रकार स्वतेज गायकवाड यांनी केले होते.या नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला,आलेल्या सर्व मान्यवरांचे तुकाराम नाना इनामके आणि सहपरिवार यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.